शहरं
Join us  
Trending Stories
1
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
2
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
3
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
4
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
5
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
6
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
7
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
8
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
9
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
10
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
11
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
12
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
13
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
14
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
15
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
16
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
17
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
18
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
19
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
20
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
Daily Top 2Weekly Top 5

वाहनधारकांची खड्ड्यांशी झुंज

By admin | Updated: November 29, 2014 23:26 IST

येथून देवळीकडे जात असलेल्या रस्त्याची चागलीच वाट लागली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्त्या असाच प्रश्न या मार्गावर प्रवास करताना

वायगाव(नि.) : येथून देवळीकडे जात असलेल्या रस्त्याची चागलीच वाट लागली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्त्या असाच प्रश्न या मार्गावर प्रवास करताना उपस्थित होतो. या मार्गाची पूर्णता वाट लागली असून रस्त्यावरील खड्डे प्रवाशाच्या जीवावर उठत आहे. ‘नजर चुकताच खड्डड्यात घुसा आणि अपघात ग्रस्त व्हा’ असाच प्रकार या मार्गावरील खड्ड्यामुळे सध्या सुरू असल्याने वाहनधारकांची सध्या खड्ड्यांशी झुंज सुरू असल्याचे बोलल्या जात आहे.
वायगाव(नि.) ते देवळी हे अंतर १२ किलो मीटरचे आहे. याच मार्गाने आजगाव, सिरसगाव हा मार्ग वडद जावे लागते. चंद्रपूर, हिंगणघाट ते पुलगाव, अमरावती जाण्यासाठी हा मार्ग जवळचा आहे. त्यामुळे या मार्गाने मोठ्या संख्येने वाहने धावतात. त्यात खाजगी बस, ट्रक आणि अन्य वाहनांचाही समावेश असतो. हा मार्ग मुख्य मार्ग असल्याने तो सुव्यवस्थित असणे अत्यंत गरजेचे आहे.
या मार्गाने प्रवास करताना विदारक अनुभव येतो. वडद ते देवळी दरम्यान तर फुटभर अंतरावर खड्यातून प्रवास करावा लागतो. त्यामुळे रस्त्यावर खड्डे की खड्डयात रस्ता आहे हेच कळायला प्रवाशांना मार्ग नसतो. नजर चुकताच वाहन चालकांचा सामना हा खड्ड्यांसोबत होतो. थोडेही लक्ष विचलित होणे वाहन चालकासाठी जीव घणे किंवा दुखापतीस कारणीभूत ठरू शकते. काही भागात तर खड्याची खोली फुटभर असल्याचे दिसून येत आहे. जागोजागी असलेल्या खड्यामुळे वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागते.
या मार्गाकडे बाधंकाम विभागाचे अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकारी फारसे फिरकत नाहीत. त्यामुळे त्यांना या मार्गाच्या दुरवस्थेचा अंदाज नसावा असे बोलले जात आहे. या मार्गावर रोज प्रवाशांना खड्ड्यांमुळे मृत्यूलाच आमंत्रण देत प्रवास करावा लागतो. रस्ता दुरुस्तीची मागणी ही वेळोवेळी होते. मात्र त्याकडे बाधंकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
वाहन चालकांना वाहणे चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत असून काही भागात रस्ता म्हणजे पांदण रस्ता असल्याचा प्रत्यय येतो. या खड्ड्यांमुळे वाहने चालविताना अनेकांना मनक्याचे तसेच सांधेदुखीचे आजारही बळावू लागल्याचे सांगितले जाते. या मार्गावर किरकोळ अपघात तर आता नित्याचेच झाले आहे. मात्र मोठा अपघात घडल्यानंतरच बाधंकाम विभागाला जाग येईल काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वर्धा मार्गे वायगावकडे जात असलेल्या मार्गावर असलेल्या कंपन्यांमधून अवजड वाहने धावत असतात. त्यामुळे या मार्गावरील रस्त्याची दुरवस्था झाली असून दुरुस्तीची मागणी आहे.(वार्ताहर)