शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

उर्ध्व वर्धातून विसर्ग सुरूच

By admin | Updated: August 7, 2015 01:54 IST

जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून आलेल्या पावसाचा चांगलाच फटका बसला. सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

पावसाचा फटका : १९६ गावातील १,१३९ कुटुंबे बाधित झाल्याचा अंदाजवर्धा: जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून आलेल्या पावसाचा चांगलाच फटका बसला. सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पावसामुळे धाम, मदन उन्नई, वर्धा कार नदी आणि सुकळी लघु प्रकल्पात गत दोन दिवसांच्या पावसाने १०० टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध झाला आहे. धाम प्रकल्पावरून १११.१०, मदन उन्नई धरणावरून ०.७८, उर्ध्व धरण १०३, वर्धा कार नदी ३५.९१, निम्न वर्धा ५५७ आणि सुकळी लघु प्रकल्प १.०९, क्युमेक्सने पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. तर निम्न वर्धाचे ३१ दरवाजे, उर्ध्व वर्धाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दोन दिवसांपूर्वी दमदार पाऊस आला. तर बुधवारी समुद्रपूर वगळता सातही तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. काही भागात या पुराचे पाणी गावात शिरल्याने त्याचा फटका नागरिकांना बसला. तर काही भागात पावसाच्या संततधारीमुळे घरांची पडझड झाली. पडझड झालेल्या घरांचा सर्व्हे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला असला तरी शेतीच्या नुकसानीचा सर्व्हे करणे बाकी असून शेतकऱ्यांना मदतीची मागणी होत आहे. गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका जिल्ह्यातील १९६ गावांना बसला. तर सततच्या पावसामुळे १ हजार १३९ घरांची पडझड झाली. यात ८८६ घरे अंशत: तर २५३ घरे पुर्णत: बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात गत २४ तासात ७०.७० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस आष्टी तालुक्यात २३.८० मि.मी एवढा नोंदविण्यात आला. आतापर्यंत सर्वाधिक पाऊसही आष्टी तालुक्यातच ६६८. मि.मी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. इतर तालुक्याची पावसाची आकडेवारी कंसात आतापर्यंतच पाऊस वर्धा ३.७० (६६६), सेलू १ (४५१), देवळी ३.२० (५३७.९०), हिंगणघाट ६५२.३२, समुद्रपूर २ (५०५.५१), आर्वी ११ (६३५.३२) आणि कारंजा २२ (६४१.७०) एकूण पाऊस ७०.७० (४७५७.७५), सरासरी ८.८४ (५९४.७२) पावसाची नोंद आहे.शेताच्या नुकसानीचा सर्वेक्षण करण्यात दिरंगाई बुधवारी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतात पाणी साचले तर बऱ्याच भागात नदी नाल्याच्या पुराखाली शेती आली. त्यातील पाणी अद्यापही बाकीच आहे. यामुळे शेतात असलेले उभे पीक खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बऱ्याच शेतातील जमीन खरडून गेली आहे. पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताचा सर्व्हे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.