शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

फोडाफोडीच्या राजकारणाने जनता त्रस्त; आगामी निवडणुकांत कौल देणार - अनिल देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 16:40 IST

पत्रकार परिषदेत भाजपवर सडकून टीका, कार्यकर्त्यांना सूचना

वर्धा : आगामी निवडणुका भारतीय जनता पक्ष स्वबळावर जिंकू शकत नाही, हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी फोडाफोडीचे राजकारण सुरू केले; मात्र या फोडाफोडीच्या राजकारणाला आता जनता त्रस्त झाली असून आगामी निवडणुकांत महाविकास आघाडीलाच कौल देणार आहे. असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त करून भाजपावर सडकून टीकाही केली. शरद पवार यांच्या गटाकडून पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पत्रपरिषदेला माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, हिंगणघाट बाजार समितीचे सभापती ॲड. सुधीर कोठारी, प्रदेश सरचिटणीस किशोर माथनकर, राजा टाकसळे आदींची उपस्थिती होती.

अनिल देशमुख पुढे म्हणाले की, सरकारमधील अस्वस्थ आमदार पुढील काळात कसे तोंड उघडतील ते पाहण्यासारखे राहणार आहे. सध्या फक्त सुरुवात झाली असून बच्चू कडू विरोधात बोलत आहे; पण आता एक एक बोलायला लागणार आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून आमदारांमध्ये मोठा गोंधळ सुरू आहे. सत्ताधाऱ्यांचा त्यांनाच सांभाळण्यात वेळ चालला असून इतर महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. सरकारने तत्काळ खातेवाटप करून नागरिकांच्या प्रश्नांना न्याय द्यावा, अशी मागणीही अनिल देशमुख यांनी केली आहे.

राज्यात सरकारमध्ये भाजपचे १०५ आमदार निवडून आले असतानाही केवळ ५ ते ६ आमदार मंत्री झालेत. घरचे बाहेर अन् बाहेरचेच घरात आले. आम्ही पक्षातले असून बाहेर आणि बाहेरून आलेले पक्षात पहिल्या पंगतीत बसत असल्याचे भाजपचेच आमदार बोलत असल्याने भाजपातील आमदार अस्वस्थ असल्याचे ते म्हणाले. काही बोटावर मोजण्या इतकेच जिल्हाध्यक्ष अजित पवार यांच्या गटात गेले असून संपूर्ण राष्ट्रवादीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे ते म्हणाले.

शिंदे गटाचे आमदार खासगीत बोलू लागले

शिंदे गटासोबत गेलेल्या ४० आमदारांपैकी अनेकांनी मंत्रिपदाची आशा आता सोडली आहे. शिंदे गटांतील ४० आमदारांपैकी कुणालाही मंत्रिमंडळात सामावून घेतले नसल्याने ते देखील अस्वस्थ आहेत. आता हळूहळू शिंदे गटातील आमदार बोलू लागले असून पुढील काळात काय होते ते नागरिक पाहतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

ट्रॅव्हल्स अपघातातील मृतांना श्रद्धांजली

सिंदखेड नजीक झालेल्या ट्रॅव्हल्स अपघातात वर्धा जिल्ह्यातील १४ जणांना जीव गमवावा लागला. ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून प्रशासनाने समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजनाही कराव्यात, असे म्हणून त्यांनी मृतकांना श्रद्धांजली वाहिली.

पक्ष अन् चिन्ह शरद पवारांकडेच

शरद पवार यांनी पक्ष बांधल्याने आज इथपर्यंत आला. राष्ट्रवादीतील महत्त्वाचे नेते सत्ताधारी पक्षात गेले याचं दुख आहे; पण राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाचे चिन्ह हे शरद पवार यांच्याकडेच राहिल, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्टीकरण दिलेले असल्याचेही अनिल देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणAnil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाAjit Pawarअजित पवार