शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

फोडाफोडीच्या राजकारणाने जनता त्रस्त; आगामी निवडणुकांत कौल देणार - अनिल देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 16:40 IST

पत्रकार परिषदेत भाजपवर सडकून टीका, कार्यकर्त्यांना सूचना

वर्धा : आगामी निवडणुका भारतीय जनता पक्ष स्वबळावर जिंकू शकत नाही, हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी फोडाफोडीचे राजकारण सुरू केले; मात्र या फोडाफोडीच्या राजकारणाला आता जनता त्रस्त झाली असून आगामी निवडणुकांत महाविकास आघाडीलाच कौल देणार आहे. असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त करून भाजपावर सडकून टीकाही केली. शरद पवार यांच्या गटाकडून पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पत्रपरिषदेला माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, हिंगणघाट बाजार समितीचे सभापती ॲड. सुधीर कोठारी, प्रदेश सरचिटणीस किशोर माथनकर, राजा टाकसळे आदींची उपस्थिती होती.

अनिल देशमुख पुढे म्हणाले की, सरकारमधील अस्वस्थ आमदार पुढील काळात कसे तोंड उघडतील ते पाहण्यासारखे राहणार आहे. सध्या फक्त सुरुवात झाली असून बच्चू कडू विरोधात बोलत आहे; पण आता एक एक बोलायला लागणार आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून आमदारांमध्ये मोठा गोंधळ सुरू आहे. सत्ताधाऱ्यांचा त्यांनाच सांभाळण्यात वेळ चालला असून इतर महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. सरकारने तत्काळ खातेवाटप करून नागरिकांच्या प्रश्नांना न्याय द्यावा, अशी मागणीही अनिल देशमुख यांनी केली आहे.

राज्यात सरकारमध्ये भाजपचे १०५ आमदार निवडून आले असतानाही केवळ ५ ते ६ आमदार मंत्री झालेत. घरचे बाहेर अन् बाहेरचेच घरात आले. आम्ही पक्षातले असून बाहेर आणि बाहेरून आलेले पक्षात पहिल्या पंगतीत बसत असल्याचे भाजपचेच आमदार बोलत असल्याने भाजपातील आमदार अस्वस्थ असल्याचे ते म्हणाले. काही बोटावर मोजण्या इतकेच जिल्हाध्यक्ष अजित पवार यांच्या गटात गेले असून संपूर्ण राष्ट्रवादीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे ते म्हणाले.

शिंदे गटाचे आमदार खासगीत बोलू लागले

शिंदे गटासोबत गेलेल्या ४० आमदारांपैकी अनेकांनी मंत्रिपदाची आशा आता सोडली आहे. शिंदे गटांतील ४० आमदारांपैकी कुणालाही मंत्रिमंडळात सामावून घेतले नसल्याने ते देखील अस्वस्थ आहेत. आता हळूहळू शिंदे गटातील आमदार बोलू लागले असून पुढील काळात काय होते ते नागरिक पाहतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

ट्रॅव्हल्स अपघातातील मृतांना श्रद्धांजली

सिंदखेड नजीक झालेल्या ट्रॅव्हल्स अपघातात वर्धा जिल्ह्यातील १४ जणांना जीव गमवावा लागला. ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून प्रशासनाने समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजनाही कराव्यात, असे म्हणून त्यांनी मृतकांना श्रद्धांजली वाहिली.

पक्ष अन् चिन्ह शरद पवारांकडेच

शरद पवार यांनी पक्ष बांधल्याने आज इथपर्यंत आला. राष्ट्रवादीतील महत्त्वाचे नेते सत्ताधारी पक्षात गेले याचं दुख आहे; पण राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाचे चिन्ह हे शरद पवार यांच्याकडेच राहिल, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्टीकरण दिलेले असल्याचेही अनिल देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणAnil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाAjit Pawarअजित पवार