शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

फोडाफोडीच्या राजकारणाने जनता त्रस्त; आगामी निवडणुकांत कौल देणार - अनिल देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 16:40 IST

पत्रकार परिषदेत भाजपवर सडकून टीका, कार्यकर्त्यांना सूचना

वर्धा : आगामी निवडणुका भारतीय जनता पक्ष स्वबळावर जिंकू शकत नाही, हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी फोडाफोडीचे राजकारण सुरू केले; मात्र या फोडाफोडीच्या राजकारणाला आता जनता त्रस्त झाली असून आगामी निवडणुकांत महाविकास आघाडीलाच कौल देणार आहे. असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त करून भाजपावर सडकून टीकाही केली. शरद पवार यांच्या गटाकडून पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पत्रपरिषदेला माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, हिंगणघाट बाजार समितीचे सभापती ॲड. सुधीर कोठारी, प्रदेश सरचिटणीस किशोर माथनकर, राजा टाकसळे आदींची उपस्थिती होती.

अनिल देशमुख पुढे म्हणाले की, सरकारमधील अस्वस्थ आमदार पुढील काळात कसे तोंड उघडतील ते पाहण्यासारखे राहणार आहे. सध्या फक्त सुरुवात झाली असून बच्चू कडू विरोधात बोलत आहे; पण आता एक एक बोलायला लागणार आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून आमदारांमध्ये मोठा गोंधळ सुरू आहे. सत्ताधाऱ्यांचा त्यांनाच सांभाळण्यात वेळ चालला असून इतर महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. सरकारने तत्काळ खातेवाटप करून नागरिकांच्या प्रश्नांना न्याय द्यावा, अशी मागणीही अनिल देशमुख यांनी केली आहे.

राज्यात सरकारमध्ये भाजपचे १०५ आमदार निवडून आले असतानाही केवळ ५ ते ६ आमदार मंत्री झालेत. घरचे बाहेर अन् बाहेरचेच घरात आले. आम्ही पक्षातले असून बाहेर आणि बाहेरून आलेले पक्षात पहिल्या पंगतीत बसत असल्याचे भाजपचेच आमदार बोलत असल्याने भाजपातील आमदार अस्वस्थ असल्याचे ते म्हणाले. काही बोटावर मोजण्या इतकेच जिल्हाध्यक्ष अजित पवार यांच्या गटात गेले असून संपूर्ण राष्ट्रवादीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे ते म्हणाले.

शिंदे गटाचे आमदार खासगीत बोलू लागले

शिंदे गटासोबत गेलेल्या ४० आमदारांपैकी अनेकांनी मंत्रिपदाची आशा आता सोडली आहे. शिंदे गटांतील ४० आमदारांपैकी कुणालाही मंत्रिमंडळात सामावून घेतले नसल्याने ते देखील अस्वस्थ आहेत. आता हळूहळू शिंदे गटातील आमदार बोलू लागले असून पुढील काळात काय होते ते नागरिक पाहतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

ट्रॅव्हल्स अपघातातील मृतांना श्रद्धांजली

सिंदखेड नजीक झालेल्या ट्रॅव्हल्स अपघातात वर्धा जिल्ह्यातील १४ जणांना जीव गमवावा लागला. ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून प्रशासनाने समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजनाही कराव्यात, असे म्हणून त्यांनी मृतकांना श्रद्धांजली वाहिली.

पक्ष अन् चिन्ह शरद पवारांकडेच

शरद पवार यांनी पक्ष बांधल्याने आज इथपर्यंत आला. राष्ट्रवादीतील महत्त्वाचे नेते सत्ताधारी पक्षात गेले याचं दुख आहे; पण राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाचे चिन्ह हे शरद पवार यांच्याकडेच राहिल, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्टीकरण दिलेले असल्याचेही अनिल देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणAnil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाAjit Pawarअजित पवार