शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

तळेगाव-आर्वी मार्ग मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 5:00 AM

वर्षभरापूर्वी तळेगाव ते आर्वी रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरूवात झाली होती. मार्गावरील काही अंतरापर्यंतचा तर काही ठिकाणी संपूर्ण रस्ताच खोदण्यात आला होता. नदी-नाल्यंवरील पूल खचवून पुलाच्या बांधकामास सुरूवात करण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक वळण मार्गाने वळविण्यात आली होती.

ठळक मुद्देअर्धवट रस्त्यामुळे अडचण : नागरिकांचा जीव मुठीत सुरू आहे प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव(श्या.पंत) : तळेगाव ते आर्वी मार्गाने प्रवास करणे सध्या नागरिकांसाठी जीवघेणे ठरत असून अपूर्ण रस्ता खोदकामामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याने हा मार्ग मृत्यूचा सापळा बनत चालल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.वर्षभरापूर्वी तळेगाव ते आर्वी रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरूवात झाली होती. मार्गावरील काही अंतरापर्यंतचा तर काही ठिकाणी संपूर्ण रस्ताच खोदण्यात आला होता. नदी-नाल्यंवरील पूल खचवून पुलाच्या बांधकामास सुरूवात करण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक वळण मार्गाने वळविण्यात आली होती. पण, रस्ता बांधकाम आणि पुलाचे काम अर्धवट सोडल्याने प्रवासादरम्यान वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे.वर्षभरात अनेक दुचाकींसह चारचाकींचे अपघात झाले आहे, अनेकांचे हात-पाय मोडून गंभीर दुखापत झाली आहे.पावसाळा सुरू होणार असून जागोजागी खोदून ठेवलेल्या रस्त्यासह पुलाचे काम अपूर्ण असल्याने रस्त्यावर पावसाच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात चिखल होत वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. पुलाच्या बाजूने काढलेल्या वळण रस्त्यावर कोणतेही सूचना फलक व दिशादर्शक फलक नसल्याने वाहन चालकास अंदाज न आल्याने अपघाताची शक्यता आहे.लॉकडाऊनमुळे वाहतुकीचे प्रमाण कमी आहे. पण, लॉकडाऊन होण्यापूर्वीच रस्त्यावर अनेकांचे अपघात झाले आहे. तळेगाव-आर्वी मार्गाचे बांधकाम रखडले असून जीव जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.रस्ता देखभालीसाठी वीस हजार प्रति किलोमीटर प्रमाणे कंत्राटदाराला शासनाकडून निधी मिळतो. मात्र, थातुरमातूर कामे दाखवून शासनाला चूना लावण्याचा प्रकार सुरू आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात येत असल्याने यावर कार्यकारी अभियंता नागपूर यांचे नियंत्रण आहे. मात्र, त्यांचेही याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात मात्र, हा रस्ता आवागमण करणाऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा बनणार असल्याने तत्काळ रस्ता काम करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.देवळी ते दहेगाव रस्त्याच्या केवळ दुरुस्तीची मंजुरी मिळाली होती. त्यामुळे खराब रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले असून उर्वरित रस्त्यावरील खड्ड्यांची डागडूजी करण्यात आली. पून्हा निधी उपलब्ध झाल्यावर नव्याने डांबरीकरण करण्यात येईल.- इंद्रकुमार पेठणकर, उपअभियंता, सा.बां.वि.,देवळी.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा