शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

तापमानाच्या चाळीशीने लाहीलाही

By admin | Updated: June 2, 2016 00:43 IST

संपूर्ण मे महिना सूर्य आग ओकत राहिला. ढगाळ वातावरणामुळे दोन ते तीन दिवस संपूर्ण महिनाभर तापमान ४० ते ४५ च्या दरम्यान होते. ...

मे हिटनंतर वर्धेकर अनुभवताहेत जून हिटचा तडाखा
वर्धा : संपूर्ण मे महिना सूर्य आग ओकत राहिला. ढगाळ वातावरणामुळे दोन ते तीन दिवस संपूर्ण महिनाभर तापमान ४० ते ४५ च्या दरम्यान होते. एवढेच नव्हे तर दोन दिवस तापमान ४६ वर पोहोचले होते. अद्यापही तापमानाची चाळीशी उतरलेली नाही. त्यामुळे मे हिटनंतर वर्धेकरांना आता जून हिटचा तडाखा सोसावा लागत आहे.
जिल्ह्यात उष्णतेचा आगडोंब उसळलेला आहे. संपूर्ण महिनाभर दिवसाचे तापमान अपवाद वगळता ४० ते ४५ अंशादरम्यान होते. त्यामुळे अंगाची लाहीलाही झाली. उष्णतेची तीवता अद्यापही कमी झालेली नाही. आजही दिवसा फिरताना नागरिकांचा जीव कासाविस होत आहे. त्यामुळे शक्य होईला तेवढे नागरिक उन्हापासून बचावासाठी बाहेर जाण्याचे टाळत आहे.
संपूर्ण मे महिन्याच्या एकंदारित तापमानाचा आढावा घेतला असता सातत्याने २३ दिवस तापमान हे ४१ ते ४२ अंशाच्या घरात होते. यामुळे दुपारी वाहणारे उष्णवारे सर्वांना बेजार करीत होते. डोक्याला रूमाल बांधल्याशिवाय कुणाही आजही बाहेर निघायला तयार नाही. त्यातच सातत्याने चार ते पाच दिवस तापमान ४५ अंशावर खेळत होते. त्यामुळे तर शहरात फिरताना भट्टी पेटली की काय असाच अनुभव येत असल्याचे नागरिक सांगत होते. मध्यंतरी ७ आणि ८ मे दरम्यान आलेल्या ढगाळ वातावरणामुळे दोन दिवस तापमान अचानक ३६ अंशावर आले. यामुळे ही दोन दिवस काहीशी सुखावणारी होती. पण त्यानंतर तापमानाने घेतलेली उचल अद्यापही कमी झालेली नाही.
सध्या जून महिना सुरू झालेला नाहे. तरीही तापमान ४० अंशाच्यआ खाली यायला तयार नाही. परिणामी मे हिटनंतर आता जून हिटचा तडाखा सोसावा लागत असल्याचे बोलल्या जात आहे. ढग जमा होत असल्याने नागरिकांना पाऊस येण्याच्या आशा आहेत. (शहर प्रतिनिधी)

सहा दिवस उन्हाचा पारा ४५ अंशावर
मे महिन्यात जिल्ह्याचा पारा तब्बल सहा दिवस ४५ अंशावर होता. यामध्ये १५ आणि २१ मे या दोन दिवशी तापमान ४५.५ अंशावर होते, तर १६ मे रोजी ४५.२ आणि १७, १९ आणि २३ या तीन दिवशी तापमान ४५ अंशावर होते. त्यामुळे ही पाच दिवस नागरिकांना बेहाल करणारी ठरली. या दिवसात नागरिकांच्या जीवाची लाही लाही झाली.

दोन दिवस पारा ४६ अंशावर
तापमान सातत्याने ४५ अंशावर असतानाच १८ मे रोजी यात वाढ होऊन पारा ४६ अंशावर पोहोचला. त्यामुळे उन्हात गेल्यावर आपली कातडी जळते की काय, असाच अनुभव वर्धेकरांना आला. या दिवशी वर्धेचे तापमान हे महाराष्ट्रात सर्वाधिक होते. ही दाहकता अनुभवत असतानाच तीन दिवसाच्या फरकाने २२ मे रोजी तापमान ४६.१ अंशावर पोहोचले. यामुळे तर नागरिक आणखीनच बेजार झाले होते. ज्या काळात पारा ४६ अंशावर पोहोचला त्या काळात जिल्ह्यासह राज्यात उष्णतेची लाट असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांना या दिवसात सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.

आता प्रतीक्षा केवळ पावसाची
वाढलेले तापमान अजूनही ४० अंशाच्या च्या खाली घसरायला तयार नाही. रोजची ऊन्ह पाहता ते कमी होईल याची चिन्हे दिसत नाही. त्यामुळे आता पाऊसच पडायला हवा तरच तापमान कमी होईल, असे बोलले जात आहे.