शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

भूईमुंगाचा पेरा ३९.२६ टक्के

By admin | Updated: April 2, 2017 00:54 IST

सिंचनाची सोय असलेल्या जिल्ह्यातील शेतकरी उन्हाळ्याच्या दिवसांत भाजीपाला, सूर्यफूल यासह मोठ्या प्रमाणात भूईमुंग पिकाची लागवड करतात.

यंदा १६२० हेक्टरचे नियोजन : गतवर्षी ३४९८ हेक्टरमध्ये होती पेरणी वर्धा : सिंचनाची सोय असलेल्या जिल्ह्यातील शेतकरी उन्हाळ्याच्या दिवसांत भाजीपाला, सूर्यफूल यासह मोठ्या प्रमाणात भूईमुंग पिकाची लागवड करतात. यंदा १ हजार ६२० हेक्टरमध्ये भूईमुंग पिकाची लागवड होईल, असा जिल्ह्यातील कृषी विभागाचा अंदाज आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात ६३६ हेक्टरमध्ये भूईमुंगाची लागवड करण्यात आली आहे. त्याची टक्केवारी ३९.२६ इतकी आहे. गतवर्षी ३ हजार ४९८ हेक्टरमध्ये भूईमुंग पिकाची लागवड करण्यात आली होती. भूईमुंग पीक घेण्यासाठी हलकी, मध्यम प्रतीची, सेंद्रीय पदार्थ व कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असलेली तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी शेतजमीन लागते. गतवर्षी जिल्ह्यात एकूण १ हजार ६२० हेक्टर इतके उन्हाळी भूईमुंगाचे नियोजित क्षेत्र होते; पण जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भूईमुंग पिकाला प्रथम प्राधान्य दिल्याने त्यावेळी एकूण ३ हजार ४९८ हेक्टरमध्ये लागवड झाली. आर्वी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी ४५ हेक्टरमध्ये सूर्यफूलाचे उत्पादन घेतले होते. यंदाच्या वर्षी मागील वर्षी इतक्याच क्षेत्रात भूईमुंग पिकाची लागवड होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील ६३६ हेक्टरमध्ये भूईमुंग पिकाची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षीपर्यंत कृषी विभागानेच भूईमुंग उत्पादक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात बियाणे उपलब्ध करून दिले होते; पण यंदा कृषी विभागाच्या सहकार्याने महाबीज सोबत समन्वय साधून ६० टक्के दराने बियाणे उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भूईमुंग पिकाकडील कल वाढावा म्हणून कृषी विभागाकडूनही प्रयत्न सुरू आहेत.(शहर प्रतिनिधी) सेलू तालुक्यात होती सर्वाधिक लागवड मागील वर्षी जिल्ह्यात १ हजार ६२० हेक्टरमध्ये भूईमुंग पिकाची लागवड होईल, असा कृषी विभागाचा अंदाज होता. यात सेलू तालुक्यात सर्वाधिक २ हजार २०० हेक्टरचा पेरा झाला होता. आर्वी तालुक्यात ५२५ हेक्टर, कारंजा (घा.) १९७, आष्टी (श.) २०९, वर्धा १२०, देवळी २३५ तर समुद्रपूर तालुकयात १२ हेक्टरमध्ये उन्हाळी भूईमुंगाचे पीक घेण्यात आले. त्याची टक्केवारी २३३ इतकी होती.