शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

कारंजातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 5:00 AM

नोव्हेंबरमध्ये नगरपंचायतची निवडणूक होऊ घातली आहे. यापूर्वी कारंजा नगरपंचायत झाल्यानंतर काँग्रेसची एक हाती सत्ता नगरपंचायतवर होती. १७ पैकी १५ नगरसेवक काँग्रेसचे, तर दोन भाजपचे होते. सध्या संपूर्ण शहरामध्ये निवडणुकीचे जोरदार चर्चा असताना जनतेमध्ये मात्र संतप्त भावना असून पहिल्यांदा आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा व नंतरच आमच्याकडे मते मागायला या, असे मतदार काँग्रेस व भाजपा या दोन्ही राजकीय पुढाऱ्यांना ठासून सांगणार आहेत.

ठळक मुद्देनागरिकांची आर्त हाक : पाच दिवसांआड होतो पाणीपुरवठा; गृहिणींची होतेय भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घाडगे) : तालुका व विशेषतः शहर पाणी समस्येसाठी जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. पाण्याची गंभीर समस्या असताना कोणत्याही राजकीय पुढाऱ्याने दीर्घकालीन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळेच ही शेकडो वर्षांची समस्या कायम आहे.१९९८ मध्ये कार नदीवर धरण बांधण्यात आले. पाण्याची समस्या कायम सुटेल असा, आशावाद कारंजावासीयांना वाटू लागला होता. अनेकांची सत्ता आल्या आणि गेली. मात्र, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी कोणीही सोडवू शकले नाही. मध्यंतरीच्या काळात खैरी धरण येथून जलवाहिनीद्वारे कारंजा शहरामध्ये व तालुक्यात नारा २२ योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ती पाईपलाईन इतकी सदोष होती की वारंवार त्या पाईपलाईन मध्ये समस्या निर्माण होऊन जलसंकट गडद होत होते. आजही कारंजा शहराला कधी ५ तर कधी सहा दिवसानंतर पाणीपुरवठा होतो. जलवाहिनी फुटली फुटली आठ दिवसपर्यंत पाणीपुरवठा होत नाही. याकडे कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांची लक्ष नाही. त्यांची अनास्था कायम आहे.नोव्हेंबरमध्ये नगरपंचायतची निवडणूक होऊ घातली आहे. यापूर्वी कारंजा नगरपंचायत झाल्यानंतर काँग्रेसची एक हाती सत्ता नगरपंचायतवर होती. १७ पैकी १५ नगरसेवक काँग्रेसचे, तर दोन भाजपचे होते. सध्या संपूर्ण शहरामध्ये निवडणुकीचे जोरदार चर्चा असताना जनतेमध्ये मात्र संतप्त भावना असून पहिल्यांदा आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा व नंतरच आमच्याकडे मते मागायला या, असे मतदार काँग्रेस व भाजपा या दोन्ही राजकीय पुढाऱ्यांना ठासून सांगणार आहेत.वाढीव पाणीपुरवठा योजनेद्वारे खैरी धरणावरून जलशुद्धीकरण करून कारंजा शहरात पाणी आणण्यात येईल येईल व दररोज शहरवासीयांना पाणीपुरवठा कसा होईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.-दादाराव केचे, आमदार, आर्वी विधानसभा.कारंजा शहराचा पाणीप्रश्न पूर्णपणे मार्गी लागलेला असून केवळ मंजुरीसाठी अडकलेला आहे. त्यासाठी माजी आमदार अमर काळे व पालकमंत्री सुनील केदार तयारीला लागलेले आहेत. निवडणुकीपूर्वी हा पाणीपुरवठा मंजुरीचा प्रश्न मार्गी लावला जाईल.-कल्पना मस्की, नगराध्यक्ष, नगरपंचायत, कारंजा.

टॅग्स :Waterपाणी