शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात होणार सेरो सर्वेक्षण, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचा पुढाकार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 23:54 IST

वर्धा जिल्ह्याच्या किती लोकसंख्येला कोरोना विषाणूची लागण झाली आहे, हे या अभ्यासातून कळणार आहे. 

वर्धा :  कोरोना विषाणूच्या प्रसारामध्ये होणारी वाढ पाहता नागपूर विभागाने विभागातील सर्व जिल्ह्यांत कोरोना विषाणूच्या प्रसाराचे मूल्यांकन अभ्यास करण्याचे ठरवले आहे. वर्धा जिल्ह्यासाठी  जिल्हा आरोग्य यंत्रणा, वर्धा यांच्या सहकार्याने महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम पुढील एक महिन्यादरम्यान हा अभ्यास करणार आहे. वर्धा जिल्ह्याच्या किती लोकसंख्येला कोरोना विषाणूची लागण झाली आहे हे या अभ्यासातुन कळणार आहे. 

एखाद्या व्यक्तीस कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यास, त्या व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये विषाणूविरूद्ध लढण्यासाठी रक्तपेशी विकसित होतात आणि  कित्येक महिने ते वर्षापर्यंत त्या रक्तप्रवाहात राहतात.  रक्ताची तपासणी करून त्या व्यक्तीस यापूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता की नाही याचा  शोध घेता येतो.विषाणूविरूद्ध लढण्यासाठी रक्तपेशी आढळलेल्या व्यक्तींमध्ये कोरोना  विषाणूची लागण होण्याची शक्यता कमी असते.  लोकसंख्येच्या सर्वेक्षणात, जास्तीत जास्त लोकांमध्ये  अशा रक्तपेशी आढळत असतील तर समुदायात कोरोना विषाणूच्या  संक्रमाणाची  शक्यता कमी असते.

सदर सर्वेक्षण सर्वसाधारण लोक, कन्टेनमेंट झोन आणि अति जोखीम गट अशा तीन गटामधून २४०० रक्ताचे नमुने घेऊन केला जाणार आहे. वर्धा येथे होणारा हा अभ्यास, सर्वसाधारण  लोक तसेच कन्टेनमेंट झोन आणि अति जोखीम गट;  उदाहरणार्थ, आरोग्य सेवेतील कर्मचारी , पोलिस, भाजी विक्रेते आणि औद्योगिक कामगार यांना यापूर्वी संसर्ग झाला की नाही या बद्दल माहिती देईल.  

या अभ्यासासाठी समुदायतुन लोक निवडून त्यांच्या रक्ताचे नमुने एका चमूद्वारे गोळा केले जातील.  संशोधन टीम निवडलेल्या भागात घरोघरी जाऊन रक्ताचे नमुने गोळा करतील. याची चाचणी विनामूल्य असेल. निकाल सहभागींना दाखवण्यात येईल; तथापि, चाचणीमधे मागील संसर्गाची स्थिती दर्शविली जाणार असल्यामुळे  पॉझिटिव्ह परिणामासाठी कोणतीही कायवाही  किंवा उपचार दिले जाणार नाही. हा अभ्यास करण्यासाठी समाजाचा पाठिंबा असणे अत्यंत आवश्यक आहे. या अभ्यासाचे निकाल  कोरोनाविरूद्ध प्रभावीपणे लढायला मदत करतील. 

 चाचणीसाठी लोकांनी सहकार्य करावे: जिल्हाधिकारी आपल्या जिल्ह्यात होत असलेला हा अभ्यास लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे. यावरून जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या संक्रमाना स्थिती काय आहे हे समजणार आहे. आरोग्य विभागाने निवडलेल्या भागातील नागरिकांनी न घाबरता ही चाचणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस