शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
9
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
10
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
11
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
12
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
13
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
14
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
15
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
16
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

‘रबर गेट’ पद्धतीने जलाशयाची प्रत्यक्ष उंची वाढविणे रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 11:54 PM

अनेकांना आधार देणाऱ्या धाम प्रकल्पाच्या उंची वाढीचा विषय १९९९ ला पहिली प्रशासकीय मान्यता मिळूनही विविध कारणास्तव आजपर्यंत मार्गी लागलेला नाही. पहिल्या प्रशासकीय मान्यतेची मुदत संपल्याने दुसरी प्रशासकीय मान्यता २००६ ला मिळाली. परंतु, प्रत्यक्ष काम मात्र सुरू झालेले नाही.

ठळक मुद्देराज्यातील पहिला प्रयोग; पण अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, प्रत्यक्ष काम तात्काळ सुरू होण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अनेकांना आधार देणाऱ्या धाम प्रकल्पाच्या उंची वाढीचा विषय १९९९ ला पहिली प्रशासकीय मान्यता मिळूनही विविध कारणास्तव आजपर्यंत मार्गी लागलेला नाही. पहिल्या प्रशासकीय मान्यतेची मुदत संपल्याने दुसरी प्रशासकीय मान्यता २००६ ला मिळाली. परंतु, प्रत्यक्ष काम मात्र सुरू झालेले नाही. ‘रबर गेट’ पद्धतीचा अवलंब धाम प्रकल्पाची १.९० मिटरने उंची वाढविण्याचा हा प्रयोग राज्यातील पहिला ठरणारा असला तरी अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळेच तो सध्या रखडल्याचे दिसून येत आहे.लघु पाटबंधारे विभागाकडे असलेला धाम प्रकल्प वर्धा पाटबंधारे विभागाकडे २०१५ मध्ये वळता करण्यात आला. त्यापुर्वीच या प्रकल्पाची उंची वाढविण्याची मागणी झाल्याने तसा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला. पहिल्या प्रस्तावाला १९९९ ला प्रशासकीय मान्यता मिळाली. परंतु, प्रत्यक्ष कामाला सुरूवात होण्यापूर्वीच सदर प्रशासकीय मान्यतेचा कालावधी संपल्याने दुसरी प्रशासकीय मान्यता २००६ मध्ये घेण्याची वेळ प्रशासनावर आली. मात्र, त्यानंतरही कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेले लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांनी दुर्लक्षच केल्याने तिसºयांदा धाम प्रकल्पाची उंची वाढविण्यासंबंधी प्रशासकीय मान्यता मिळविण्याची वेळ वर्धा पाटबंधारे विभागावर आली आहे.सध्या वर्धा शहर व शहराशेजारी असलेल्या ग्रामीण भागातील नागरिंकांना जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यातही आचारसंहितेदरम्यान जलसंकटावर मात करण्यासाठी असलेली विविध कामे हाती घेण्यास निवडणूक विभागाची मनाई नसताना सदर विषय मार्गा लावण्यासाठी कुठलाही लोकप्रतिनिधी पुढाकार घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जनतेच्या समस्या बाजूला सारून केवळ राजकारण हाच त्यांचा एकमेव धंदा आहे काय, असा प्रश्न सध्या वर्ध्यातील सुजान नागरिकांकडून विचारला जात आहे. नागरिकांची समस्या आणि धाम प्रकल्पाची उंची वाढल्यानंतर वर्धेकरांना होणारे फायदे लक्षात घेवून जिल्हाधिकाºयांनी या विषयी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. शिवाय तशी मागणीही आहे.वनजमीन अधिग्रहणाची प्रक्रिया कासवगतीनेचमहाकाळी येथील धाम नदीवर धाम प्रकल्प तयार करताना जी शेतजमीन अधिग्रहित करण्यात आली त्याच शेतजमिनीवर प्रकल्पाची उंची वाढल्यावर पाणी साठविले जाणार आहे. शिवाय प्रकल्पाच्या उंची वाढीनंतर थोड्या प्रमाणात झुडपी वनजमीन पाण्याखाली येणार आहे. असे असले तरी वनजमीन अधिग्रहणाची कार्यवाही सध्या कासवगतीनेच होत असल्याचे सांगण्यात आले.धाम प्रकल्पाच्या उंची वाढीचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, २९ मार्चला ‘धामची उंची वाढतेय कागदावरच’ या मथळ्याखाली लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच आपण तातडीने बैठक बोलावली होती. त्या बैठकीत सदर विषयाला अनुसरून संबंधितांकडून आढावा जाणून घेण्यात आला. अंतिम मंजुरी मिळताच उर्वरित प्रक्रिया पार पाडली जाईल.- विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा.ं

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई