रस्त्याचे काम रखडले... अल्लीपूर येथील मुख्य रस्त्याचे काम महिनाभरापासून बंद आहे. सभागृह ते पुलापर्यंत हा रस्ता खड्डेमय झाला असून सर्वत्र गिट्टी उघडी पडली आहे. याच मार्गावर शाळा, महाविद्यालय, दवाखाना, बैल बाजार, कृषी कार्यालय आणि बसस्थानक असल्याने तो महत्त्वाचा आहे. खड्डेमय रस्त्यामुळे अपघातांत वाढ झाली असून ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}