शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

आगरगावात रखडले आठ महिन्यांपासून रस्त्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

भूजमपूजनानंतर रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. आठ महिन्यांच्या कालावधीत ठेकेदाराने पंचवीस टक्केही रस्त्याचे काम केले नाही. केवळ मुरुम आणि चुरी अंथरण्याचे काम झाले असून तेही अर्धवट अवस्थेत आहे. कंत्राटदाराचा मनमर्जी कारभार सुरू आहे. असे असताना जि. प. बांधकाम विभागाचे अधिकारीही मौन बाळगून आहेत. अडचणी सहन कराव्या लागत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देजि. प. बांधकाम विभागाची अनागोंदी : ग्रामस्थ त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कआगरगाव : येथे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत १० लाख रुपयांच्या रस्ता बांधकामाचे फेब्रुवारीमध्ये भूमिपूजन झाले. आठ महिन्याचा कालावधी लोटूनही अद्याप या रस्त्याचे काम पंचवीस टक्केही पूर्ण झालेले नाही. यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे कंत्राटदारासह जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.भूजमपूजनानंतर रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. आठ महिन्यांच्या कालावधीत ठेकेदाराने पंचवीस टक्केही रस्त्याचे काम केले नाही. केवळ मुरुम आणि चुरी अंथरण्याचे काम झाले असून तेही अर्धवट अवस्थेत आहे. कंत्राटदाराचा मनमर्जी कारभार सुरू आहे. असे असताना जि. प. बांधकाम विभागाचे अधिकारीही मौन बाळगून आहेत. अडचणी सहन कराव्या लागत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.आगरगाव बस थांबा ते बाजार चौक या डांबरीकरण रस्त्याचे काम गेल्या आठ महिन्यांपासून बंद आहे. परिणामी, ग्रामस्थांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्ता बांधकामाचा दर्जा सुमार असल्याचीही ओरड होत आहे. रस्त्यावर केवळ मुरूम आणि चुरी अंथरल्यामुळे वाहने घसरून दररोज अपघात होत आहेत. मात्र, कंत्राटदार आणि बांधकाम विभागाला सोयरसुतक नाही.पावसामुळे रस्त्यांची लागली वाटआष्टी (शहीद) : अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. तळेगाव- आष्टी- साहूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. यामुळे अपघात होत आहेत. हीच परिस्थिती इतरही रस्त्यांची झाली आहे. तळेगाववरून आष्टीला येण्यासाठी हाच मुख्य मार्ग आहे. या मार्गावर मुरूम टाकण्यात आला. २५ टक्के सिमेंट काँक्रिटचे काम झाले आहे. मात्र, कामाची गती मंद आहे. आष्टी-मोर्शी, आष्टी-थार, पार्डी, टेकोडा, गोदावरी, देलवाडी, अंबिकापूर या रस्त्यांचीही वाईट अवस्था झाली आहे. गावातील अंतर्गत रस्तेही दुर्दशित आहेत. शासनाच्या सोयीसुविधा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी रस्त्यांची समस्या मार्गी लावणे गरजेचे आहे. तालुक्यात आष्टी-किन्हाळा, गोदावरी या रस्त्याने जाताना नरकयातना सहन कराव्या लागत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कामे मंजूर झाली; अद्याप सुरू झाली नाही. परिणामी नागरिकांना माती तुडवत ४ कि़मी. जावे लागत आहे. खडकी खंबीत-बेलोरा या रस्त्यासाठी वर्षभरापासून निधी आला आहे. मात्र, कंत्राटदार कामच करीत नसल्याने नागरिकांत रोष आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा