शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

पुलाच्या दुरुस्तीचे कामही दर्जाहीन

By admin | Updated: January 12, 2016 01:59 IST

सेलू ते हिंगणी या मार्गावरील किन्ही गावालगतचा पूल अपघाताला निमंत्रण देणारा ठरत होता.

ग्रामस्थांची ओरड : एकाच पावसात पूल वाहून जाण्याची भीतीबोरधरण : सेलू ते हिंगणी या मार्गावरील किन्ही गावालगतचा पूल अपघाताला निमंत्रण देणारा ठरत होता. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करताच बांधकाम विभागाने पुलाची दुरूस्ती केली. पण नव्याने झालेले पुलाचे कामही दर्जाहिन झाल्याची ओरड नागरिकांद्वारे व प्रवाश्यांद्वारे होत आहे. सेलू ते हिंगणी हा मार्ग बोरधरणकडे जाणाऱ्या पर्यटकांसह नागपूर येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीचा आहे. नागपूर करिता हा मार्ग जवळचा असल्याने या मार्गावरून दिवसभर प्रवाशांची वर्दळ असते. बोर अभयारण्याला भेट देण्याकरिता येणाऱ्या पर्यटकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे या रस्त्यावर सर्वत्र वाहनांची गर्दी वाढू लागली आहे. अशातच रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या शेतातील पाणी नदीपात्रात वाहून जाण्यासाठी असलेल्या किन्ही गावाजवळील लहान पुलाची अत्यंत दुरवस्था झाली होती. रस्त्याखालून सिमेंट पायल्या टाकून सदर पूल तयार करण्यात आला होता. वाढलेल्या वाहतुकीमुळे तीन ते चार वर्षांपूर्वी पुलाच्या दोन्ही बाजू खचल्या होत्या. त्यामुळे पूल नरजेस पडत नव्हता. रात्रीला अपघाताच्या घटना वाढू लागल्या होत्या.यासंदर्भात लोकमतने काही दिवसांपूर्वी बातमी प्रकाशित करताच सदर पुलाचे काम नव्याने करण्यात आले. नवीन पायल्या टाकण्यात आल्या. परंतु पायल्या टाकताना केवळ माती टाकून तकलादू काम करण्यात आले. यामुळे दुरुस्तीचे कामही निकृष्ठ केल्याने या कामाचा फायदा काय असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे. केवळ माती व मुरूम टाकण्यात आल्याने येथे वाहने घसरण्याची शक्यता बळावली आहे. तसेच एकाच पावसात नालीसहीत रस्त्याच वाहून जाण्याची भीतीही निर्माण झाली आहे. त्यामुळे या पुलाचे पक्के बांधकाम करून मागणी होत आहे. अपघाताची शक्यता लक्षात घेता ही गरज व्यक्त होत आहे.(वार्ताहर) अपघाताचा धोका कायमतुटलेल्या पुलाचे काम करताना तेथीलच माती टाकून पुलाचे तात्पुरते काम करण्यात आले. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. नवीन पायल्या टाकताना जोत्याचा भर टाकणे आवश्यक असताना तसे न करताच पायल्या टाकण्यात आल्या. एवढेच नव्हे तर पायल्या पायल्या घसरू नये यासाठी सिमेंट काँक्रीट टाकणे आवश्यक असतानाही केवळ माती व मुरूम टाकण्यात आले. त्यामुळे हा पूल केव्हा खचून जाईल याचा नेम नाही. रोजचे पाणी वाहून जातानाही यातील माती वाहून जात आहे. त्यामुळे पुढे जाऊन मोठा धोका निर्माण होण्याचे शक्यता बळावली आहे. पुलाची अवस्था पाहता एकाच पावसात हा पूल वाहून जाण्याची शक्यता असल्याचे प्रवासी व ग्रामस्थ सांगत आहेत. पक्के बांधकाम करण्याची मागणीबोरधरणकडे जाणाऱ्या पर्यटकांसह नागपूर येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा पूल सोयीचा आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते.रात्रीलाही हा रस्ता वाहता असल्याने हा पूल धोक्याचा ठरत आहे. त्यामुळे सदर पुलाचे पक्के बांधकाम करण्याची मागणी होत आहे.