शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

वर्ध्यात देशात सर्वांधिक पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 11:39 PM

शुक्रवारी हवामान खात्याच्या अंदाजानुसार वर्धेत बऱ्याच दांडीनंतर वरूण राजा बरसला. देशात सर्वाधिक पाऊस वर्धा जिल्ह्यात झाल्याची नोंद स्कायमेट व्हेदर यांनी घेतली आहे. त्यांनी ११७ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद घेतली. देशातील १० पावसाच्या ठिकाणावर ही माहिती गोळा करण्यात आली.

ठळक मुद्देएकाच दिवशी ६९४ मि.मी. पाऊस : सर्व तालुक्यात बरसला वरूणराजा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शुक्रवारी हवामान खात्याच्या अंदाजानुसार वर्धेत बऱ्याच दांडीनंतर वरूण राजा बरसला. देशात सर्वाधिक पाऊस वर्धा जिल्ह्यात झाल्याची नोंद स्कायमेट व्हेदर यांनी घेतली आहे. त्यांनी ११७ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद घेतली. देशातील १० पावसाच्या ठिकाणावर ही माहिती गोळा करण्यात आली. वर्धेत २२ सप्टेंबर सरासरी ६९७.९४ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली.२२ सप्टेंबर रोजी सेलू तालुक्यात सेलू येथे ९८ मि.मी., सिंदी (रेल्वे) ८७ मि.मी. , हिंंगणी ७२ मि.मी., झडशी ८१ मि.मी., केळझर ८६ मि.मी. असा एकूण ४२४ मि.मी. पाऊस ८४.०८ मि.मी. सरासरीने पडला. आष्टी तालुक्यात आष्टी येथे ४१.२ मि.मी., साहूर येथे ५४ मि.मी., तळेगाव ५०.२ मि.मी. पाऊस झाला. ४८.४६ च्या सरासरीने १४५.४ मि.मी. पाऊस झाला. आर्वी येथे ५१ मि.मी., वाटोडा येथे ५६ मि.मी., वाढोणा येथे ८ मि.मी., विरूळ येथे ७४ मि.मी., रोहणा येथे ६१मि.मी., खरांगणा येथे ४७.४ मि.मी. पाऊस ४९.५६ च्या सरासरीने झाला. या तालुक्यात २९७.४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. समुद्रपूर येथे ९१ मि.मी., जाम येथे ५५ मि.मी., गिरड येथे ५५ मि.मी., नंदोरी येथे १०० मि.मी., कोरा येथे ५५ मि.मी., वायगाव (गों.) येथे ५९.२ मि.मी., कांढळी येथे १०० मि.मी., मांडगाव येथे ८८ मि.मी. पाऊस झाला. समुद्रपूर तालुक्यात ७५.४ मि.मी. च्या सरासरीने ६०३.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. हिंगणघाट तालुक्यात २२६. २४ मि.मी. पाऊस झाला आहे. हिंगणघाट येथे २३९.५ मि.मी., सावली (वाघ) २५२ मि.मी., वडनेर येथे १९७. ४ मि.मी., पोहणा येथे १९० मि.मी., सिरसगाव येथे २२० मि.मी., अल्लीपूर येथे २४० मि.मी., कानगाव येथे २४६ मि.मी., वाघोली २२५ मि.मी. पाऊस झाला. देवळी तालुक्यात देवळी येथे १४४.२ मि.मी., भिडी येथे १३० मि.मी., अंदोरी येथे ५५ मि.मी., गिरोली २०० मि.मी., पुलगाव येथे १६६ मि.मी., विजयगोपाल येथे ४० मि.मी. पाऊस झाला. देवळी तालुक्यात सरासरी १२२.५३ मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली. संपूर्ण वर्धा जिल्ह्यात ९९.३० मि.मी. सरासरीने ७८४.३६ मि.मी. पाऊस झाला. २२ सप्टेंबर या एकाच दिवशी वर्धा तालुक्यात १२१.८५ मिमी., सेलू येथे ७७७.५८, देवळी येथे ७०८.७६, हिंगणघाट येथे ९५५.३० मि.मी., समुद्रपूर येथे ६८७.२८ मि.मी., आर्वी येथे ६२२.१८, आष्टी येथे ५४४.०५ मि.मी., कारंजा येथे ५९१.६२ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात ५५८३.५१ मि.मी. पाऊस, ६९७.९४ च्या सरासरीने झालेला आहे. या पावसानंतर सोयाबीन पिकाला काही दिलासा मिळाला असला तरी जिल्ह्यावर दृष्काळाचे सावट आहे.

टॅग्स :Rainपाऊस