शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

‘बोरीबाऱ्हा’च्या पुनर्वसनाचा प्रश्न खितपत

By admin | Updated: October 16, 2015 02:58 IST

तलाव फुटण्याच्या भीतीने लगतचे बोरीबाऱ्हा हे गाव विस्थापित झाले. येथील नागरिकांना गत दोन वर्षांपासून जंगलात झोपडीवजा घरे बांधून जीवन कंठावे लागत आहे.

जंगलातील झोपड्यांत राहतात ग्रामस्थ : वीज, पाणी, रस्ता आदी मूलभूत सुविधांचाही अभावसचिन देवतळे विरूळ (आ.)तलाव फुटण्याच्या भीतीने लगतचे बोरीबाऱ्हा हे गाव विस्थापित झाले. येथील नागरिकांना गत दोन वर्षांपासून जंगलात झोपडीवजा घरे बांधून जीवन कंठावे लागत आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांसह वन्य जीवांच्या धास्तीत ही कुटुंबे राहत आहे. शासन, प्रशासनाकडे निवेदने देऊनही उपयोग होत नसल्याने न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देत ग्रामस्थांना मुलभूत सुविधा पुरवाव्या, अशी मागणी होत आहे. शासन, प्रशासनाच्या नजरेतून हरविलेले एक दुर्दैवी गाव म्हणूनच सध्या बोरीबाऱ्हा गावाचा उल्लेख होऊ लागला आहे. गत दोन वर्षांपासून येथील काही ग्रामस्थ जंगलात ठोकलेल्या झोपडीमध्येच वास्तव्यास आहे. या ग्रामस्थांना अधिकारी मुर्ख बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी आपले गाव सोडले. तेव्हापासून त्यांना शासनाची कुठलीही मदत प्राप्त झाली नाही. बाऱ्हा येथील कुटुंबाचे पुनर्वसन न केल्याने त्यांना अंधाऱ्या रात्री सरपटणाऱ्या प्राण्यांच्या सानिध्यात चिमुकल्यांसह जगावे लागत आहे. बोरीबाऱ्हा या गावात कोलाम आदिवासी बांधवांची वस्ती आहे. मोलमजुरी करून येथील नागरिक आपल्या संसाराचा गाडा हाकतात. बाऱ्हा गावाला लागून एक मोठा तलाव आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी हा तलाव तुडूंब भरला होता. तलाव फुटण्याच्या भीतीने प्रशासनाने बाऱ्हा येथील कुटुंबांचे स्थलांतरन करून एका शेतात पाल टाकून त्यांची निवासाची तात्पुरती व्यवस्था केली; पण कुठल्याही मुलभूत सोयी, सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही. यामुळे पावसाळ्यातही ग्रामस्थांना जंगलातच दिवस काढावे लागत आहे. या ठिकाणी कोणत्याही शासकीय योजना पोहोचल्या नाही. काही दिवसांनी काहीच व्यवस्था नसल्याने काही ग्रामस्था परत आपल्या गावी राहायला गेले; पण काही कुटुंब अजूनही या जंगलात पाल टाकून वास्तव्यास आहेत. दोन वर्षांपासून हे गाव पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. अद्याप साधी वीजही येथे पोहोचली नाही. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. उर्वरित कुटुंबेही पावसाळा सुरू झाला की, याच शेतात राहायला येतात. सध्या हे गाव पूर्णपणे भकास झाले आहे. गावात कुठल्याही सुविधा नाहीत. कित्येक वर्षांपासून येथील ग्रामस्थांनी बोरीबाऱ्हा ते विरूळ या रस्त्याची मागणी केली; पण स्वातंत्र्यानंतरच्या काळात त्यांची रस्त्याची मागणीही पूर्ण होऊ शकली नाही. विरूळ हे बाजाराचे ठिकाण असल्याने त्यांना नेहमीच येथे ये-जा करावी लागते. पावसाळ्यात कंबरभर पाण्यातून दोन किमीचा प्रवास करावा लागतो. राहायला घर नाही, वहिवाटीसाठी रस्ता नाही, रोगराई पसरल्यावर डॉक्टर नाही. यामुळे विरूळ वा पुलगाव येथे बैलबंडीने दवाखान्यात न्यावे लागते. अतिवृष्टी झाल्यास घरांना ओल चढते. यामुळे आजार पसरतात व वैद्यकीय सेवेसाठी भटकंती करावी लागते. येथील नागरिकांच्या हाताला काम नाही. दोन वेळच्या जेवणाचा प्रश्नही गंभीर आहे. पीक नाही, घरी लग्नाच्या मुली आहे; पण प्रशासन त्याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचेच दिसते. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे.