शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनच्या लांबणीने बियाणे बाजारावर अवकळा

By admin | Updated: July 5, 2014 23:44 IST

पाऊस लांबल्यामुळे खत व बियाण्यांची विक्री पूर्णपणे थांबली आहे. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी हजारो टन खत व बी भरून ठेवले आहे. त्यामध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे. बियाणे व खताची विक्री सध्या थांबली आहे.

वर्धा : पाऊस लांबल्यामुळे खत व बियाण्यांची विक्री पूर्णपणे थांबली आहे. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी हजारो टन खत व बी भरून ठेवले आहे. त्यामध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे. बियाणे व खताची विक्री सध्या थांबली आहे. मान्सून लांबल्यामुळे पिकांची पेरणीची वेळही आता बदलणार आहे. यामुळे आता या बियाण्यांचे काय करायचे असा प्रश्न विके्रत्यांसमोर उभा ठाकला आहे.दर वर्षी सरासरी जूनच्या अखेरच्या आठवड्यात जवळपास ७० टक्के पेरणी पूर्ण होत असते. पेरणीसाठी लागणारे बियाण्यांची बुकींग व्यापारी दिवाळीच्या नंतर लगेच करून ठेवतात. त्यानुसार त्यांना माल उपलब्ध होतो. पावसाळ्यात माल कमी पडू नये म्हणून काळजी घेतलेली असते. तेव्हापासून व्यापाऱ्यांचा पैसा कंपन्याकडे जमा असतो. साधारण मे महिन्याच्या मध्यापासून शेतकरी बियाणे खरेदीसाठी येत असतात. कारण नंतर बियाण्यांचे भाव अचानक वाढवले जातात, तर कधी खताचा तुटवडा जाणवतो. त्यआमुळे शेतकरी आधीच बियाणे खरेदी करतात. मात्र यंदा जुलैच्या मध्यापर्यंतही जिल्ह्यात पेरणी पूर्णपणे आटोपणार का यावर प्रश्नचिन्ह आहे. यामुळे शेतकरी वर्गासोबतच व्यापारी वर्गही चिंतेत अडकला आहे. एकंदरीत बियाण्याच्या व खताच्या खरेदीमध्ये अडकलेले हजारो कोटीचे व्यवहारही थांबले आहेत. बाजारातही मंदीचे सावट निर्माण झाले आहे. व्यापाऱ्यांनी बियाणे विक्रीसाठी घेतले तरी शेतकरी बियाणे घेण्यासाठी तयार नाहीत. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी खत व बियाण्यामध्ये केलेली हजारो कोटी रूपयाची गुंतवणूक आता डोकेदुखी ठरत आहेत. पाऊस नसल्यामुळे पेरणीला सुरूवात झाली नाही. काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. त्यांच्यावर दुबार पेरणीचे वेळ आली आहे.(शहर प्रतिनिधी)