शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
2
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
3
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
4
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
5
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
6
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
7
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
8
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
9
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
10
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
11
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
12
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
13
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
14
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
15
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
16
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
17
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
18
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
19
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
20
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
Daily Top 2Weekly Top 5

शिंदुल्यांच्या झांज्यांची प्रथा आश्रमात आजही कायम

By admin | Updated: May 30, 2016 01:48 IST

मातीपासून तयार झालेल्या बापुकूटीच्या भिंतीला पावसाच्या पाण्याचा मारा बसू नये याकरिता ...

पावसापासून बापुकूटीच्या संरक्षणाची तयारी : मातीच्या भिंतीला बांधल्या जात आहेत झांज्या
सेवाग्राम: मातीपासून तयार झालेल्या बापुकूटीच्या भिंतीला पावसाच्या पाण्याचा मारा बसू नये याकरिता पूर्वीपासूनच शिंदुल्याच्या पानांपासून तयार करण्यात येत असलेल्या झांज्या लावण्याची प्रथा आहे. पावसाच्या पाण्यापासून इमारत बचावाकरिता अनेक अत्याधुनिक वस्तू बाजारात आल्या असताना सेवाग्राम आश्रमात आजही ही प्रथा जपल्या जात आहे. आजही या शिंदुल्याच्या पाण्याच्या झांज्या लावून पावसापासून बापुकूटीच्या भिंतीचे संरक्षण सुूर आहे.
बापुकूटी संपूर्ण देशाकरिता पे्ररणास्थान असल्याने येथे देशविदेशातील विचारवंत व पर्यटक येतात. आश्रमातील स्मारके माती व कुडाचे असल्याने पावसाच्या पाण्याचा मारा बसून या भिंतीना नुकसान पोहोचण्याची शक्यता आहे. आश्रमात महात्मा गांधी वास्तव्यास असताना भिंतीच्या संरक्षणाकरिता शिंदुल्यांच्या झांड्या लावल्या होत्या. तेव्हापासून ही प्रथा आजही जपली जात आहे. दर वर्षी लावलेल्या झांज्या काढून त्या सुरक्षित ठेवत पुढच्या वर्षी वापरण्यात येतात. तर ज्या खराब झाल्या त्या नष्ट करून नव्याने दुसऱ्या तयार करण्यात येतात. आश्रमात आदी निवास, बा व बापुकूटी, बापू दप्तर, आखरी निवास, रसोडा आदी स्मारके आहेत. यातील आखरी निवास व रसोडा वगळता सर्व स्मारके माती, कुंड, बांबू आदी साहित्यापासून बनविण्यात आलेल्या आहेत. पावसाळ्यात या भिंतींना धोका असतो. यामुळे त्यांच्या रक्षणासाठी शिंदूल्यांच्या झांड्या तयार करून भिंतीना लावण्याची परंपरा होती. या भागात मोठ्या प्रमाणात शिंदूल्याचे जंगलच असल्याने बापूंच्या काळापासूनच झांड्या लावण्याला प्रारंभ झाला होता. आज शिंदुल्यांच्या झाडांचे प्रमाण कमी झाले शिवाय त्या पाण्यापासून झांज्या तयार करणारे कारागिर मिळत नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याने सांगण्यात येत आहे. करंजी, पुजई नाही तर रामटेक येथून पानं आणून त्याच्या झांज्या तयार करण्यात येत आहे. पावसापूर्वीच कामाला प्रारंभ झाला असून पहिले बापुकूटी व बापू दप्तरला झांज्या लावण्यात येत आहे.(वार्ताहर)

साहित्य मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न
पूर्वीच्या तुलनेत आज असे साहित्य मिळविणे कठीण झाले आहे. शिंदुल्याचे जंगल कमी झाल्याने पाने मिळत नाही. यामुळे बाहेर जिल्ह्यातून ही पाने मागवावी लागत आहेत. मात्र नैसर्गिक पद्धत जपण्याची आश्रमाची प्रथा मोडणे शक्य नाही. यामुळे अनेक प्रयत्नांती साहित्य मिळविण्यात येते.