शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

बाजारातील वाहतूक व्यवस्थेला पोलिसांकडूनच छेद

By admin | Updated: August 23, 2015 02:10 IST

शहरातील बाजारात गेल्यावर अव्यवस्थेचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हातगाड्या, पार्किंगच्या सुविधेअभावी कुठेही अस्ताव्यस्त उभी असलेली दुचाकी वाहने,

रूपेश खैरी / प्रशांत हेलोंडे वर्धाशहरातील बाजारात गेल्यावर अव्यवस्थेचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हातगाड्या, पार्किंगच्या सुविधेअभावी कुठेही अस्ताव्यस्त उभी असलेली दुचाकी वाहने, दुकान मालकांची चारकाही वाहने यामुळे येथून पायी चालनेही कठीण होत असल्याचे वास्तव आहे. या सर्व स्थितीवर आळा घालण्याकरिता पोलीस विभागाच्यावतीने काही रस्ते ‘वन वे’ केले होते; मात्र त्यांच्या या व्यवस्थेला त्यांच्याच विभागाकडूनच छेद दिल्याचे शनिवारी समोर आले. बाजारात येणाऱ्या नागरिकांना त्रास होवू नये याकरिता पोलीस विभाग व नगर परिषदेत झालेल्या चर्चेतून मार्ग काढण्यात आला होता. यात दिवसाआड रस्त्याच्या एका कडेला पार्किंग करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले होते. यामुळे रस्त्याची एक बाजू मोकळी राहत होती; मात्र आता त्या पार्किंगलाही ग्रहण लागले आहे. बाजारात रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी आहेत. ‘वन वे’ चा फलक असताना व्यवस्था निर्माण करणारे पोलिसच त्या फलकांना जुमानत नसल्याचे समोर आले आहे. पोलिसच या फलकांना नुमानत नसेल तर नागरिकांचे काय, असा प्रश्न समोर येत आहे. येथील अनाज लाईन परिसरातील ‘नो एन्ट्री’ असलेल्या फलकातून आत जात पोलीस विभागानेच नियमांना बगल दिल्याचे दिसून आले आहे. वर्धेकरांकरिता रोज गररजेच्या साहित्य खरेदीकरिता असलेल्या बाजार अतिक्रमणात हरविला आहे. दुकान मालकांनी त्यांच्या दुकानातील रस्त्यावर आणलेले साहित्य, चौरस्ता वा एखादा चौक पाहून फेरीवाल्याने लावलेल्या दुकानामुळे येथे नागरिकांना पायदळ चालनेही कठीण. नागरिकांना भाजीपाला मिळण्याकरिता पालिकेच्यावतीने सुरू केलेल्या टिळक भाजी बाजाराची दैना झाली आहे. बाजारात जाण्याचा रस्ता सोडून बाहेर हातगाड्यांसह दुकाने सजली आहेत. ही दुकाने रस्त्याच्या कडेला नाही तर रस्त्यावरच आली आहेत. सराफा लाईन, अंबिका चौक व पानाचंद चौकातही हिच अवस्था आहे. येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या फेरीवाल्यांमुळे बाजाराहाटाकरिता आलेल्या नागरिकांना त्रासाला समोरे जावे लागत आहे.