शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा नदीच्या पात्रामध्ये वनस्पती व घाण

By admin | Updated: May 27, 2015 01:54 IST

भाजपाची सत्ता आल्यानंतर सर्वप्रथम नदी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. गंगेचे पात्र स्वच्छ करतानाच अन्य नद्यांचे पाणीही निर्मळ होईल,..

प्रशांत हेलोंडे  वर्धाभाजपाची सत्ता आल्यानंतर सर्वप्रथम नदी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. गंगेचे पात्र स्वच्छ करतानाच अन्य नद्यांचे पाणीही निर्मळ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती; पण आता ती धुसर होत आहे. वर्धा नदीच्या पात्रात पुलगाव येथे विविध वनस्पती वाढली असून घाणही साचली आहे. यामुळे पिण्यासह शेती, उद्योगांना पाणी पुरविणारी वरदायिनी कधी स्वच्छ होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मध्य प्रदेशातून वाहत येणारी वर्धा नदी अमरावती, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्याकरिता वरदायिनी ठरली आहे. या नदीवर अप्पर वर्धा व निम्न वर्धा अशी दोन धरणे असून पुलगाव येथेही बॅरेज होऊ घातला आहे. पिण्यासह सिंचन व उद्योगांना पाणी पुरवित असतानाच जिल्ह्याला मोठा महसूल मिळवून देण्याचे कामही वर्धा नदीचे पात्र करीत आहे. या नदीवर असलेल्या रेती घाटांतून शासनाला कोट्यवधीचा महसूल मिळतो; पण नदी पात्राकडे पर्यायाने पर्यावरण समतोलाकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नसल्याचेच दिसते. सध्या पुलगाव येथे वर्धा नदीचे पात्र प्रदूषित झाले आहे. निम्न वर्धा प्रकल्प असलेल्या धनोडी, आर्वी तालुक्यात आणि पूढे चंद्रपूरकडे जाणारे पात्रही घाणीच्या विळख्यात अडकले आहे. पुलगाव येथील पात्रात विविध वनस्पतींची वाढ झाली असून घाणही साचली आहे. यामुळे नदीचे पात्रच धोक्यात आले आहे. पुलगाव नगर परिषद तसेच जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देत नदी पात्राला जीवन देणे गरजेचे झाले आहे.महसुलाकडे दिले जाते लक्ष; पात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजनांचा अभाववर्धा नदीवर जिल्ह्यातील आष्टी, आर्वी आणि देवळी तालुक्यात रेती घाट आहेत. शिवाय अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातही घाट असून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जातो. यातून तीनही जिल्ह्यांना कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो; पण वर्धा नदीच्या पात्राकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नाही. किंबहुना ज्या गावांमध्ये रेती घाट आहेत, त्या गावांच्या विकासाकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. पुलगाव शहराच्या सिमेवरून वाहणारी वर्धा नदी वरदान ठरली आहे; पण या वरदायिनीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. वर्धा नदीचे पात्र अनेक ठिकाणी झाडा-झुडपांसह विविध वनस्पती व घाणीच्या विळख्यात सापडले आहे; पण ते साफ करण्यासाठी कुणीही पुढाकार घेताना दिसत नाही. शिवाय पात्र उथळ झाल्याने पाणी साठत नाही. यामुळे नदीच्या काठावर वसलेल्या अनेक गावांना पुराचा धोका असतो. पावसाळ्यात अनेक गावांना धोक्याचा इशारा दिला जातो; पण पात्र खोलीकरण वा स्वच्छतेकडे कुणी लक्ष देत नाही. काही दिवसांपूर्वी पवनार येथील धाम नदीच्या स्वच्छतेचा फार्स करण्यात आला; पण ते पात्रही साफ झाले नाही. यामुळे तेथेही हीच समस्या भेडसावत आहे. नदी स्वच्छता अभियान राबविले जात असले तरी वर्धा जिल्ह्यातील नद्यांपर्यंत हे अभियान पोहोचलेच नसल्याचे दिसते. यामुळेच नदीचे पात्र धोक्यात आले आहे. पुलगाव येथील वर्धा नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी वनस्पती वाढली असून शेवाळ साचले आहे. काही ठिकाणी निर्माल्यही नदीतच टाकले जाते. नदी पात्राला झुडपांचा वेढा पडला आहे. शासन, प्रशासनाने याकडे लक्ष देत नदी स्वच्छता अभियानाला वेग देणे गरजेचे झाले आहे.