पर्यावरणाचा समतोल व स्थायी विकास साधून वाळू घाट लिलावाच्या प्रक्रियेत लोकांना अधिकतम प्रमाणात सहभागी करुन घेणे, वाळू उत्खननाचा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्याच्या हिताचे रक्षण करतानाच वाळूघाट लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता आणून शासनाच्या महसूलात वाढ करण्यासाठ ...
जप्त केलेला ३० ब्रास वाळूसाठा तळेगाव (श्या.पं.) ग्रामपंचायतचे प्रभारी ग्रामसेवक अमोल उदखेडे यांच्याकडे सुपूर्तनाम्यावर सोपविण्यात आला होता. मात्र, त्याच रात्री ३० ब्रास वाळूसाठा अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याबाबत प्रभारी ग्रामसेवक अमोल उदखेडे यांनी ...
ज्या जिल्ह्यातून स्त्रियांचे स्वातंत्र्य व प्रतिष्ठा जोपासण्याची सुरुवात झाली त्याच जिल्ह्यामध्ये प्राध्यापिकाला जाळून मारण्याची घटना घडणे ही बाब चिंतनाची आहे. त्यामुळेच आत्मचिंतन व श्रद्धांजली वाहिण्याकरिता शुक्रवार १४ फेब्रुवारीला महिला हिंसाचार वि ...
हिंगणघाट येथील नंदोरी चौकात प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तिचा उपचारादरम्यान सोमवारी सकाळी नागपूर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. पीडितेच्या मृत्यूची वार्ता गावात पोहोचताच संतप्त नागरिकांनी रास्तारोको ...
सोमवारी तणावपूर्ण शांततेत जळीत प्रकरणातील पीडित प्राध्यापिकेवर हिंगणघाट तालुक्यातील तिच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेच्या अंत्यसंस्कारानंतरही गावात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त कायम होता. तर मंगळवारी पीडितेच् ...
५ मार्च २०१५ ला फिर्यादीचा पती कापूस भरण्यासाठी बाहेर गेला होता. त्यावेळी पीडिता ही तिच्या मुलासोबत घरी होती. दरम्यान आरोपी राजू इंगळे याने पीडितेच्या घरात प्रवेश करून तिचा विनयभंग केला. शिवाय जिवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने आरडा-ओरड केली. शिवाय द ...
आफिद हकिमउद्दीन इसाजी यांचे गोल बाजार परिसरात घर आणि तळ मजल्यावर हार्डवेअरचे दुकान आहे. याच दुकानाला चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास टार्गेट केले. दुकानाचे शटर वाकवून दुकानातील गल्ल्यातून १ लाख ४० हजारांची रोख चोरून नेली. सकाळी ही घटना उघडकीस येताच इसा ...
वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठेत दत्त मंदिर जवळील एका सराफा व्यावसायिकाचे दुकान आणि गोल बाजार परिसरातील एका हार्डवेअरच्या दुकानाला चोरट्यांनी टार्गेट करून तेथून रोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला. ...
आरोपी व पीडिता यांच्या दोघांच्याही घराजवळ पोलिसांचा मोठा लवाजमा राहात होता. दररोज रात्री गावात तरूण व नागरिक रस्त्यावर उतरून मोर्चा काढून या घटनेचा निषेध करीत होते. मात्र या गावाने आपला संयम ढळू दिला नाही. अखेर सोमवारी १० तारेखाला दुखाची बातमी आली. ...