शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
5
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
6
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
7
Success Story : शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं Nirmaला मोठा ब्रँड; सायकलवरुन ₹३ किलोनं विकली पावडर; वाचा करसनभाईंची कहाणी
8
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
9
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
10
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
11
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
12
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
13
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
14
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
15
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
16
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
17
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
18
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
19
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
20
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल

१५ दिवसांपासून वहिवाट ठप्प; शेतीकामे खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 5:00 AM

परिसरात झालेल्या दमदार पावसाने आलेल्या पुरात डिगडोह ते देवळीकडे जाणारा डांबरी रस्ता खचून गेला. तब्बल १५ दिवसांचा कालावधी उलटला पण, रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे बैलबंडी नेणेही शक्य होत असून संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. डिगडोह येथील नागरिकांना देवळीच मुख्य बाजारपेठ आहे.

ठळक मुद्देपुराच्या पाण्यात रस्ता गेला वाहून : शेती साहित्य आणण्यासाठी १५ कि.मी.चा मारावा लागतोय फेरा

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : नजीकच्या डिगडोह येथील देवळी मार्गावरील पुलाजवळचा डांबरी रस्ता २६ जून रोजी आलेल्या पुरात वाहून गेला होता. त्यामुळे मागील १५ दिवसांपासून शेतकऱ्यांची वहिवाट ठप्प असून शेतीच्या हंगामात शेतीकामे खोळंबल्याने शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे.परिसरात झालेल्या दमदार पावसाने आलेल्या पुरात डिगडोह ते देवळीकडे जाणारा डांबरी रस्ता खचून गेला. तब्बल १५ दिवसांचा कालावधी उलटला पण, रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे बैलबंडी नेणेही शक्य होत असून संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. डिगडोह येथील नागरिकांना देवळीच मुख्य बाजारपेठ आहे.शेतीपयोगी साहित्य आणायचे असल्यास त्यांनी तीन किमी अंतरासाठी चक्क १५ किमीचे अंतर गाठावे लागत आहे. त्यासाठी वाहनकिराया तिप्पटीने द्यावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शेतात जायचे असल्यास चार ते पाच किमीचे अंतर गाठावे लागत आहे.संबंधित विभागाने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.लोकप्रतिनिधींच्या सूचनेनंतर प्रशासन उदासीनदेवळी येथून हाकेच्या अंतरावर डिगडोह गाव आहे. तसेच जि.प.उपाध्यांचेही गाव अवघ्या चार किमीवर आहे. खासदार रामदास तडस आणि जि.प.उपाध्यक्षा वैशाली येरावार यांनी खचलेल्या रस्त्याची पाहणी केली होती. पण, आज १५ दिवस उलटून गेले तरीही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने शेतकºयांसह नागरिकांमधून शासनाच्या धोरणांविषारी नाराजीचा सूर उमटत आहे.या रस्त्याने दुचाकी काढणेही जिकरीचे झाले आहे. इतकेच नव्हेतर पायदळ चालताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. शेती वाहिसाठी देखील अवघड झाले आहे.- मंगेश येसनखेडे, शेतकरी, डिगडोह.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर