शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

८८० कृषी केंद्रांवर नऊ पथकांची वक्रदृष्टी

By admin | Updated: May 23, 2015 02:17 IST

खरीप हंगाम तोंडावर असून शेतकऱ्यांनी त्यांची तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांकडून जिल्ह्यातील ८८० कृषी केंद्रांतून बियाणे व इतर साहित्याची खरेदी सुरू झाली आहे.

शेतकऱ्यांकरिता तक्रार निवारण केंद्र : बियाण्यांबाबत सतर्कतेचा इशारा वर्धा: खरीप हंगाम तोंडावर असून शेतकऱ्यांनी त्यांची तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांकडून जिल्ह्यातील ८८० कृषी केंद्रांतून बियाणे व इतर साहित्याची खरेदी सुरू झाली आहे. यात शेतकऱ्यांची फसगत होणार नाही याची दक्षता घेण्याकरिता कृषी विभागाच्यावतीने नऊ पथके तयार करण्यात आली आहे. या पथकाची करडी नजर या कृषी केंद्रांवर राहणार आहे. कृषी विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या या नऊ पथकात एक जिल्हास्तरीय व आठ तालुकास्तरीय पथक कार्यरत राहणार आहे. एका पथकात एकूण पाच कर्मचारी राहणार आहे. पथकातील एकूण ४५ कर्मचाऱ्यांची नजर कृषी केंद्रावर राहणार आहे. या केंद्रातून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. गत वर्षी जिल्ह्यात एकूण ६० केंद्रांवर कारवाई करण्यात आली होती. यातीन तिघांचा परवाना रद्द करण्यात आला होता तर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. इतर कारवाईत सुमारे ८० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. यंदाच्या खरिपात ४.२० लाख हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. यात १ लाख १० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होणार आहे. याकरिता एकूण ७० हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. तर २ लाख ३८ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड होणार आहे. याकरिता एकूण १०.५६ लाख पाकिटांची गरज आहे. मात्र जिल्ह्यात आजच्याघडीला केवळ ३ लाख पाकिटे उपलब्ध झाली आहेत. कपाशीच्या बियाण्यांकरिता शेतकऱ्यांची धावपळ होणार असल्याचे चित्र आहे. याचा लाभ घेत कृषी केंद्र चालकांकडून बियाण्यांच्या काळ्या बाजाराची शक्यता वर्तविली जात आहे. शेतकऱ्यांना खरीपात खताकरिता भटकण्याची वेळ येणार नसल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. हंगामाकरिता ९४ हजार ४०० मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर असून ते जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. शिवाय रबी हंगामातील २३ हजार मेट्रिक टन खत शिल्लक असल्याचे कळविण्यात आले आहे.(प्रतिनिधी)घरगुती बियाण्यांचा वापर करताना उगवण क्षमता तपासण्याचा सल्ला गत हंगामात सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्याने शेतकऱ्यांना घरगुती बियाण्यांचा वापर करावा लागणार आहे. यामुळे घरचे सोयाबीन पेरताना त्याची उगवण क्षमता तपासून त्याचा पेरा करण्याची खबरदारी शेतकऱ्यांनी घेण्याची वेळ आली आहे. उगवण क्षमता तपासण्याची पद्धतही कृषी विभागाच्यावतीने दिली आहे. उपलब्ध असलेल्या सोयाबीनपैकी प्रत्येक थैलीतील १० दाणे एका घडी केलेल्या ओल्या कागदारवर ठेवावे. या कागदावर ठेवलेले बियाणे कागदासह पुन्हा एका कागदात गुंडाळावे. गुंडाळलेले हे बियाणे एका प्लास्टिकच्या थैलित ठेवावे. चार दिवसानंतर ते बियाणे काढून पहावे. यात दहा पैकी आठ बियाणे अंकुरल्यास त्याची उगवण क्षमता ८० टक्के समजावी तर सात बियाणे अंकुरल्यास उगवण क्षमता ७० टक्के समजावी असे कृषी विभागाच्यावतीने कळविले आहे. पेरा करताना उगवण क्षमतेनुसार हेक्टरी बियाणे वापरण्याचा सल्ला दिला आहे. पत्रव्यवहारानंतर महाबीजने वाढविले आवंटन जिल्ह्याच्या कृषी विभागाने महाबीजला सोयाबीनच्या २५ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी केली होती. महाबिजने एवढे बियाणे पुरविण्यास असमर्थता दर्शवित ६ हजार क्विंटल बियाणे पुरविण्याचे कृषी विभागाला कळविले होते. यावर जि.प.चे कृषी विकास अधिकारी एम.एस. खळीकर यांनी केलेल्या पत्रव्यवहारावर महाबीजने जिल्ह्याला आता ८ हजार ८०० क्विंटल सोयाबीन पुरविण्याचे मान्य केले आहे. महाबिज पुरविणार असलेले बियाणे गरजेच्या तुलनेत कमी असल्याचे शेतकऱ्यांना घरच्याच बियाण्यांवर अवलंबून राहावे लागणार असल्याचे चित्र आहे.बियाणे, खते व कीटकनाशकांबाबत शेतकऱ्यांची फसगत झाली तर त्याच्या तक्रारी नोंदविण्याकरिता तालुका स्तरावर तक्रार निवारण केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात शेतकऱ्यांनी होणारा बियाण्यांचा काळाबाजार, लिकिंगची माहिती दिल्यास कारवाई करणे शक्य होईल, असे कृषी विभागाने कळविले आहे.