शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

इको फ्रेंडली गणेशोत्सवासाठी कृतीची गरज

By admin | Updated: September 7, 2014 00:05 IST

पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना समाजमनात शतप्रतिशत प्रमाणात रूजविण्याचे ध्येय आहे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय तर ते शक्यच नाही. बदलत्या काळानुसार उत्सवाचे स्वरुपही पालटत आहे;

श्रेया केने - वर्धापर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना समाजमनात शतप्रतिशत प्रमाणात रूजविण्याचे ध्येय आहे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय तर ते शक्यच नाही. बदलत्या काळानुसार उत्सवाचे स्वरुपही पालटत आहे; मात्र ते बिभत्सतेकडे झुकणारे असून यामुळे सामाजिक आरोग्यही धोक्यात आले आहे. हे बदलायचे असेल तर त्याची सुरुवात स्वत:पासून करायला हवी. कोणतीही सामाजिक चळवळ उभारायची असल्यास त्याला ‘केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे’ ही उक्ती लागू पडते, असे मत गजेंद्र सुरकार यांनी चर्चे दरम्यान व्यक्त केले.सार्वजनिक गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेश उत्सव हा उपक्रम जिल्ह्यात सर्वप्रथम राबविणारे कार्यवाहक गजेंद्र सुरकार यांच्यासोबत ‘लोकमत’ ने संवाद साधला. यावेळी त्यांनी या उपक्रमाची सुरुवात, यश आणि व्याप्ती यावर चर्चेदरम्यान प्रकाश टाकला.सामाजिक चळवळीतील सहभागाची सुरुवात कशी झाली याची माहिती देताना ते म्हणाले, १९९८-९९ दरम्यान खगोलशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ अनिल सदगोपालन यांनी भारतीय जनविज्ञान जत्था ही मोहीम राबविली. यात जिल्हा कार्यवाहक म्हणून माझ्याकडे जबाबदारी देण्यात आली. पूढे अंनिसच्या माध्यमातून सामाजिक जागृती चळवळीत सक्रीय झालो. सर्वप्रथम संविधान महोत्सव हा उपक्रम जिल्ह्यात राबवून नागरिकांना त्यांचे कर्तव्य आणि जबाबदारी याचे भान ठेवणे राष्ट्राच्या प्रगतीकरिता किती आवश्यक आहे, हे पटवून दिले. शिवाय विज्ञान दिनानिमित्त सुडो सायन्स या कार्यक्रमातून शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले. सर्पविज्ञान, होळीचा उपक्रम, आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचा सत्कार या माध्यमातून सदैव सामाजिक व जागृतीपर मोहीम सक्रीय पद्धतीने राबविल्या आहे.उत्सव हा पर्यावरणपूरक असला पाहिजे याकरिता आग्रही आहोत. याला सकारात्मक आणि नकारात्मक असे प्रतिसाद आहेत. मात्र यातही हार न मानता आजवर आम्ही विविध कार्यक्रम, परिपत्रक आणि उपक्रमाच्या माध्यमातून जागृती सुरू ठेवली आहे. याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याने हा उपक्रम यशस्वी होत आहे. धर्मसंकेताचे पालन करताना प्रत्येकाने आपल्या पर्यावरणाला बाधा पोहचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पीओपी मूर्तींचे जलस्त्रोतात विसर्जन केल्याने त्यातील रासायनिक पदार्थाने जलप्रदुषण होते. त्यातील अविघटनशील पदार्थामुळे दुर्धर आजार बळावण्याचा धोका जनतेपर्यंत पोहचवायचा आहे.