शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
8
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
9
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
10
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
13
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
14
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
15
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
17
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
18
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
19
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
20
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वनक्षेत्रात होते सर्वाधिक जलसंधारण

By admin | Updated: April 2, 2017 00:43 IST

सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी तथा भूजल पातळी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे.

ंजलयुक्त शिवार : ६८२ कामांना ११.१६ कोटींचा निधी मंजूर, २८२ कामे झालीत पूर्ण प्रशांत हेलोंडे   वर्धा सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी तथा भूजल पातळी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत कृषी विभागासह वन विभागामार्फतही ही कामे मोठ्या प्रमाणात केली जात आहेत. या कामांमुळे वनक्षेत्रात सर्वाधिक जलसंधारण होत असल्याचे पाहावयास मिळते. वन विभागाच्या ६८२ कामांना शासनाकडून मंजुरी मिळाली असून ११.१६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जंगल भागात होणारी कामे मानवासह प्राणी, पक्ष्यांसाठी तथा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची समजली जातात. यामुळे राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार अभियानात कृषी विभाग, अन्य संस्थांसह वन विभागाकडेही विविध कामे सोपविण्यात आली आहेत. वन संवर्धन व संरक्षणासोबतच वन विभागाद्वारे जलयुक्त शिवार अभियानात जलसाठा वाढविण्याचे कामही केले जात आहे. वन विभागाकडून ढाळीचे बांध, नाला खोलीकरण, दगडी बांध या कामांसह पाणी साठवणूक तलावांची निर्मिती केली जात आहे. परिणामी, मोठ्या प्रमाणात जलसंचय होत असून भूजल पातळी वाढत असल्याचे समोर आले आहे. वन विभागाकरिता ६८२ कामे मंजूर असून . यासाठी ११ कोटी १६ लाख ३४ हजार रुपयांच्या निधीची तरतूदही आहे. यातील वन विभागाकडून आतापर्यंत २८२ कामे पूर्ण केली आहेत. या कामांवर ३ कोटी ५५ लाख २० हजार रुपयांचा खर्च झाला आहे. या माध्यमातून जंगल क्षेत्रातील पाणी साठवणूक वाढली असून वन्य प्राणी, पक्ष्यांच्या पाण्याची सोय झाली आहे. वनक्षेत्रात घनदात वृक्षवेली राहत असल्याने त्या भागात पाणी जमिनीत मुरते. या क्षेत्रात पाणी साठवणूक तलाव व खोल-समतल चर केल्याने वाहून जाणारे पाणी अडते व भूजल पातळीत लक्षनिय वाढ होते. वन विभागाची आणखी ३२४ कामे प्रगतिपथावर आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर जलयुक्त शिवारमुळे वन क्षेत्रातील जलसंचय वाढून पर्यायाने लगतच्या शेतजमिनींनाही फायदाच होणार आहे. जंगल भागालगतच्या गावांतील विहिरींची पातळी वाढल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. जंगलांतील पाणीटंचाई होणार दूर जंगल क्षेत्रामध्ये नदी, नाले नसले तरी पाणीटंचाई निर्माण होते. परिणामी, वन विभागाला कृत्रिम पाणवठे निर्माण करून त्यात टँकरद्वारे पाणी टाकावे लागते. प्रसंगी विंधनविहिरींचे खोदकाम करावे लागते. जलयुक्त शिवार अभियानात बऱ्यापैकी जलसंचय झाला आहे. यामुळे जंगलातील पाणीटंचाई दूर होणार असून सिंचन क्षमतेतही वाढ होणार आहे.