शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अत्यल्प पेन्शन, मोफत प्रवासही नाही

By admin | Updated: January 3, 2016 02:46 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात अल्प वेतनावर अहोरात्र आपले आयुष्य घालविणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना चहा-पाण्याच्या खर्चाइतकीही पेन्शन मिळत नाही.

राज्य परिवहन महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची व्यथातळेगाव (श्या.पंत) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात अल्प वेतनावर अहोरात्र आपले आयुष्य घालविणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना चहा-पाण्याच्या खर्चाइतकीही पेन्शन मिळत नाही. शिवाय त्यांना वृद्धापकाळात बसने विनामूल्य प्रवास करण्याची मुभाही दिली जात नाही. यामुळे निवृत्त कर्मचारी हतबल झाले आहेत. वृद्धापकाळात तरी शासनाने दिलासा द्यावा, अशी मागणी निवृत्त वाहतूक नियंत्रक विनायक तभाने यांनी केली आहे. राज्य परिवहन महामंडळामध्ये ३५ ते ४० वर्षे वाहक-चालक पदावर दिवस-रात्र सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन नियमानुसार ५८ वर्षे पूर्ण होताच निवृत्ती दिली जाते. संपूर्ण सेवाकाळात अत्यल्प वेतनावर हे कर्मचारी कार्यरत असतात. निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शनही अत्यल्प असून त्या रकमेतून औषधोपचार, दैनंदिन खर्चही भागत नाही. अशावेळी नातलगाच्या भेटीला वा देवदर्शनाला एसटी बसने प्रवास करण्यासाठीही या कर्मचाऱ्यांकडे पैसा राहत नाही. शासनाच्या अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना मरेपर्यंत सोई-सुविधा दिल्या जातात; पण परिवहनच्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही सुविधा मिळत नाही. एसटीचा कर्मचारी दिवाळी, दसरा, लग्न, मुत्यू वा अन्य कोणत्याही दिवशी कुटुंबात राहू शकत नाही. केवळ सेवा तत्त्वावर एसटी आपले घर व प्रवासी नातलग समजून वयाचे ५८ वर्षे हिवाळा, पावसाळा, उन्हाळ्यात एसटीतच धावत असतात. त्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर परिवहन महामंडळही वाऱ्यावर सोडत असल्याचा प्रत्यय येत आहे. या प्रकारामुळे परिवहनच्या निवृत्त कमचाऱ्यांचे हाल होत असल्याचे दिसते. राज्य परिवहन महामंडळाने कर्मचाऱ्यांना किमान जगण्यापूरते निवृत्तीवेतन देणे गरजेचे आहे. शिवाय निवृत्तीनंतर एसटीच्या कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विनायक तभाने यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली आहे.(वार्ताहर)