शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

लेंडी नाला उठला जीवावर ४५० कुटुंबांना धोका

By admin | Updated: February 12, 2015 01:35 IST

गत २२ वर्षांपासून शहीदभूमीच्या ४५० कुटुंबांची अवहेलना सुरू आहे. लेंडी नदीच्या काठावरील दोन्ही बाजुला असलेल्या वस्तीमध्ये दरवर्षी पावसाळ्यात येणाऱ्या पुराचे पाणी जाते़ ...

अमोल सोटे आष्टी (श़)गत २२ वर्षांपासून शहीदभूमीच्या ४५० कुटुंबांची अवहेलना सुरू आहे. लेंडी नदीच्या काठावरील दोन्ही बाजुला असलेल्या वस्तीमध्ये दरवर्षी पावसाळ्यात येणाऱ्या पुराचे पाणी जाते़ यामुळे नागरिक त्रस्त आहेत़ वस्तीमध्ये जायला धड रस्ता नाही. मधोमध एकमेव असलेला पूलही जीर्ण झाला आहे. शासनाकडे वारंवार प्रस्ताव पाठवूनही दखल घेतली जात नसल्यासने संरक्षण भिंतीचे घोडे अडले आहे़रंगारपेढ नाल्यापासून वाहणारे पाणी लेंडी नदीला मिळते. याठिकाणी पाण्याचा प्रवाह कमी-अधिक होत असतो़ यामुळे उपलब्ध जागेतून पाणी जात असल्याने ऐनवेळी पाण्याचा धोका उद्भवतो. नदीला लागूनच वस्ती आहे. परिस्थिती जेमतेम असलेली ही कुटुंबे येथे वास्तव्याला आहे. दोन वेळच्या जेवण्याची चिंता असलेल्या कुटुंबांना आपल्या निवाऱ्याला सुरक्षा भिंत बांधण्याची सोय नाही. यामुळे शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे; पण शासकीय उदासिनता आड येत आहे़ या नदीची सिमा दीड किमी गावातून गेली आहे. नदीकाठावर एकूण ४५० कुटुंब असून लोकसंख्या १३०० आहे. आदिवासी व मुस्लीम समाजाचे वास्तव्य आहे. १९९२ मध्ये लेंडी नदीला मोठा पूर आला होता. त्यानंतर २००६ मध्ये पुराने प्रचंड नुकसान झाले. नदीच्या पात्रात धोप्याची पाने व गवत वाढले होते. याची साफसफाई ग्रा़पं़ प्रशासनाने केली होती. काही प्रमाणात नाल्याचे खोलीकरण व नदीचे पात्रही खोल केले होते; पण कालौघात पाण्याच्या प्रवाहाने पात्र पूर्णत: बुजले़या भागातील नागरिक ग्रा़पं़ व पंचायत समितीकडे वारंवार संरक्षण भिंत बांधण्याची मागणी करतात; पण प्रशासन अपूऱ्या निधीमुळे बांधकाम करू शकत नसल्याचे कारण पूढे रेटत आहे़ या परिसराला वॉर्ड क्रमांक दोनचा पुर्व भाग लागून आहे. सध्या या वॉर्डच्या महिला संगीता कौरती आष्टीच्या सरपंच आहेत़ यापूर्वीही शालिनी इरपाची, सुशिला कोडापे या महिला सदस्यांनी वॉर्डाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांनीही प्रशासनाकडे संरक्षण भिंतीच्या कामासाठी निधीची मागणी केली आहे. शासनाने पूर संरक्षण निधीतून दीड किमी लांबीची भिंत त्वरित बांधून देणे गरजेचे आहे. संघर्ष सरकार दरबारी मांडणारया वॉर्डातील वसंत बोरेकर, रामेश्वर जाधव, अनिल कोडापे, देविदास कोकाटे, महादेव राऊत, सहादेव शेंदरे, जमीला बी, रामदास माने, हफीजा बी, परविन निसा, शेख शकील, शालिनी इरपाची, सुशिला कोडापे यांच्यासह अनेक नागरिक वारंवार प्रशासन दरबारी समस्या मांडत आहेत; पण त्यांच्या निवेदनांना भिक घातली जात नसल्याचेच दिसते़आमदारांनी दिले होते आश्वासनलेंडी नदीच्या काठावरील वस्तीला पुरापासून मुक्त करण्यासाठी पूर संरक्षण भिंतीचे बांधकाम व जीर्ण झालेल्या पूल मोडीत काढून नवीन बांधकाम करून देण्यासाठी शासनाकडे लवकरच प्रस्ताव पाठवून काम मंजूर करून आणणार असल्याचे आश्वासन आमदार अमर काळे यांनी नागरिकांना दिले होते. आता या आश्वासनाची पूर्ती कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़