शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांकडून नुकसानग्रस्त शेतांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST

लाल्यामुळे कपाशीचे पीक भडंगले असून आजच नसल्यात जमा झाले आहे. पाणबसन जमिनीतील सोयाबीनचे पीक अजूनही सवंगण्याअभावी पडले आहे. हुस्रापूर येथील सुभाष फुलकर वाबगावातील धनराज पाल, चोंडी येथील राजू रोकडे, भिडी येथील विनोद पांडे, प्रमोद कडूकर, मनोज बोबडे तसेच आकोली येथील भगवान बोडे यांच्या शेतातील पऱ्हाटी व सोयाबीन पिकाची दैना झाली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । केंद्र सरकारकडे तातडीची मदत मागणार, शेतकऱ्यांना दिला विश्वास

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : तालुक्यातील कपाशी पिकांसोबतच इतर शेतमालाबाबतची दुष्काळी स्थिती लक्षात घेता खासदार रामदास तडस यांनी या भागाची पाहणी केली.कपाशीचे पीक वाढले आहे. परंतु, बोंडे नाहीत. आहे ती बोंडे सततच्या पावसामुळे सडली आहेत. काही पऱ्हाट्या पिवळ्या पडून भडंगल्या आहे, अशा प्रकारची भावना खासदार तडस यांनी यावेळी व्यक्त केली. केंद्र शासनाने या भागाची पाहणी करून नुकसानीचा आढावा घ्यावा. राज्य शासनाला तशा प्रकारचे निर्देश देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खासदार तडस यांनी केली. यावेळी जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे, तालुका कृषी अधिकारी अतुल वायस व भिडीचे माजी सरपंच राजू रोकडे उपस्थित होते. यावेळी खासदार तडस यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून तालुक्यातील भिडी, दुरगुडा, हुस्रापूर, आकोली, चोंडी, हेटी आदी गावातील शेतमालाची पाहणी केली. काही ठिकाणी चार पदरी रस्त्याच्या उंच बांधकामामुळे तसेच यामुळे शेतातील पाणी बाहेर निघण्यास मार्ग नसल्याने सोयाबीनचे पीक पाण्याखाली येऊन जागीच सडले आहे. लाल्यामुळे कपाशीचे पीक भडंगले असून आजच नसल्यात जमा झाले आहे. पाणबसन जमिनीतील सोयाबीनचे पीक अजूनही सवंगण्याअभावी पडले आहे. हुस्रापूर येथील सुभाष फुलकर वाबगावातील धनराज पाल, चोंडी येथील राजू रोकडे, भिडी येथील विनोद पांडे, प्रमोद कडूकर, मनोज बोबडे तसेच आकोली येथील भगवान बोडे यांच्या शेतातील पऱ्हाटी व सोयाबीन पिकाची दैना झाली आहे. तालुक्यात पाच हजार ७५५ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. यापैकी ५ हजार ४५७ शेतकऱ्यांच्या पीककर्जातून विम्याची रक्कम कपात करण्यात आली. २९८ शेतकºयांनी पीक विम्याची रक्कम भरली. या विम्याचा फायदा शेतमालाला होईल काय? याबाबत अधिकाºयांकडे उत्तर नसल्याने हा विमा दरवर्षीप्रमाणे स्टंट ठरू पाहत आहे. शासनाने लक्ष देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार तडस यांनी केली आहे.पावसामुळे बाधीत झालेल्या शेतमालाचे पंचनामे करण्यासाठी शासनाने आदेश दिले आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांचे पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करणार आहे. पंचनामे नि:पक्ष पद्धतीने केली जाणार आहे.- अतुल वायस, तालुका कृषी अधिकारी, देवळी

टॅग्स :agricultureशेतीRamdas Tadasरामदास तडस