शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

रोहित्राच्या दुरुस्तीसाठी विद्युत कंपनीद्वारे अडवणूक

By admin | Updated: July 3, 2014 23:43 IST

निसर्गाच्या प्रकोपामुळे आधीच शेतकरी खचला आहे. गतवर्षी अतिवष्टी, रब्बी हंगामात गारपीट, वादळ आणि आता कोरडा दुष्काळ यात शेतकरी पूर्णत: भरडला जात आहे़ महावितरणनेही शेतकऱ्यांच्या

वायगाव (नि.) : निसर्गाच्या प्रकोपामुळे आधीच शेतकरी खचला आहे. गतवर्षी अतिवष्टी, रब्बी हंगामात गारपीट, वादळ आणि आता कोरडा दुष्काळ यात शेतकरी पूर्णत: भरडला जात आहे़ महावितरणनेही शेतकऱ्यांच्या अडवणुकीचेच धोरण राबविले आहे़ रोहित्रातील बिघाड दुरुस्त करण्यासाठी महावितरण शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांना ओलित करणे कठीण झाले आहे़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़ वायगाव (नि.) विद्युत उपके्रदांत येणाऱ्या मौजा रायपुर येथील रोहित्र क्रमांक दोनचे ट्रान्सफार्मर गत दहा दिवसांपासून बंद आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्यात; पण अद्यापही रोहित्र व ट्रान्सफार्मरची दुरूस्ती करण्यात आलेली नाही़ याबाबत तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आधी बिल भरण्याची सक्ती करीत असल्याचा आरोपही केला जात आहे़ यामुळे शेतकरी आणखीच अडचणीत सापडला आहे़ शेतकऱ्यांनी शेतात पेरणी केली आहे. पाऊन न आल्याने कोरड्या दुष्काळाची स्थिती आहे़ यामुळे आधीच शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यात शेतकऱ्यांचा वीज पुरवठा बंद आहे़ शेतकरी दुरूस्तीसाठी तक्रार करण्यास गेल्यास विद्युत वितरण कंपनीकडून अडवणूक करून वसुली केली जात आहे. गत वर्षापासून शेतकरी नुकसान सहन करीत आहे़ यंदाही शेतात कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिकांची पेरणी करून शेतकरी आकाशाकडे टक लावून बसला आहे. विहिरीतून पाणी आणून पिकांना वाचविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत; पण दहा दिवसांपासून रोहित्र बंद आहे़ यात रोहित्रावरील शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर शेतातील पिके पाणी नसल्याने वाळत आहे; पण वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता व अधिकारी बिल भरल्याशिवाय वीज पुरवठा सुरू केला जाणार नाही, असे सांगत आहे़ यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे़ आधीच पिचलेचा शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडला आहे. बी-बियाणे, खते वाया जात असताना महावितरण अडवणूक करीत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.(वार्ताहर)