शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

बेशरममध्ये हरवले धाम नदीचे पात्र

By admin | Updated: February 28, 2017 01:13 IST

वर्धा शहरासह अनेक गावांना पिण्याचे पाणी पूरविणारी धाम नदी सध्या अस्वच्छतेच्या कचाट्यात सापडली आहे.

पाणी होतेय दूषित : पाटबंधारे विभाग, जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायतीचेही दुर्लक्षचमोईन शेख आंजी (मोठी)वर्धा शहरासह अनेक गावांना पिण्याचे पाणी पूरविणारी धाम नदी सध्या अस्वच्छतेच्या कचाट्यात सापडली आहे. नदी पात्रात सर्वत्र बेशरम वाढली असून शेवाळ साचले आहे. परिणामी, पाणी दूषित होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे लक्ष देत धाम नदीचे पात्र स्वच्छ करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. आंजी येथून वाहणारी धाम नदी बेशरम व इतर झुडपांनी हरविल्याचे चित्र आहे. बेशरम वाढल्याने तथा झुडपांमुळे नदीचे पात्रच दिसेनासे झाले आहे. धाम नदी महाकाळी प्रकल्पातून वाहत असून वणा नदीला जाऊन मिळते. या नदीचे पात्र सर्वत्रच बेशरम व झुडपांनी पूर्णत: बुजलेले दिसून येते. यामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह आणि दिशाच बददल्याचे दिसून येते. महाकाळी प्रकल्पापासून येळाकेळीपर्यंत ही नदीच मुख्य कालवा म्हणून कार्य करते. त्यामुळे नदीच्या स्वच्छतेची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. १९८५ पासून महाकाळी प्रकल्प कार्यान्वित झाला आहे; पण अद्याप एकदाही नदीचे पात्र साफ करण्यात आलेले नाही. यामुळे नदीने आपल्या प्रवाहाचा मार्ग बदलल्याचे दिसून येते. परिणामी, नदी पात्र सरळीकरण आणि स्वच्छतेची मागणी ग्रामस्थांतून होत आहे; पण ग्रा.पं. प्रशासनला हे काम परवडण्यासारखे नसल्याने कधी कुणी पुढाकार घेतल्याचे ऐकिवात नाही.महाकाळी प्रकल्पापासून काचनूर, मोरांगणा, खरांगणा, कामठी, सेवा, खैरी, आंजी, सुकळी, येळाकेळीपर्यंत नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात बेशरम आणि विविध वनस्पतींच्या झुडपांनी हरविल्याचे चित्र आहे. पावसाळ्यात नदीला पूर येते. त्यावेळी पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होत असल्याने नदीचे पाणी गावात शिरते. परिणामी, पुरामुळे गावाला धोका निर्माण झाला आहे. महाकाळी ते येळाकेळीपर्यंत ही नदी कालव्याचे काम करीत असल्याने पाटबंधारे विभागाने पात्राची स्वच्छता करणे गरजेचे आहे; पण हा विभाग नदीच्या पात्राकडे कधीही लक्ष देताना दिसत नाही. ग्रामपंचायत प्रशासन नदीच्या स्वच्छतेकरिता मोठ्या प्रमाणात निधी खर्च करू शकत नाही आणि जिल्हा प्रशासनही दुर्लक्ष करीत आहे. यामुळे नदीच्या काठावरील गावांना धोका निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.पाणी पुरवठा योजनांनाही धोकाचधाम नदीवर वर्धा शहरासह अनेक गावांतील पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. या योजनांच्या परिसरातही अनेक ठिकाणी बेशरमची झाडे तथा झुडपेही वाढली आहे. नदी पात्रामध्ये अनेक ठिकाणी शेवाळ साचले आहे. यामुळे पाणी अवरुद्ध होत आहे. परिणामी, पाणी पुरवठ्याच्या यंत्रणांमध्ये दोष निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या नदीवरून जीवन प्राधिकरण, नगर परिषद वर्धा तथा अन्य गावांना पाणी पुरवठा केला जातो. यामुळे ही नदी स्वच्छ करीत योजनांचा भविष्यातील धोका टाळणे गरजेचे झाले आहे.