शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

धान्य व्यापाऱ्याची हत्या?

By admin | Updated: November 29, 2014 01:55 IST

सेलू तालुक्यातील येळाकेळी येथील धान्याचे व्यापारी सुधाकर लक्ष्मण दाते (५५) यांचा ...

हिंगणघाट : सेलू तालुक्यातील येळाकेळी येथील धान्याचे व्यापारी सुधाकर लक्ष्मण दाते (५५) यांचा शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर नांदगाव चौकापासून ६०० मीटर अंतरावर संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असली तरी घटनास्थळाच्या अवलोकनावरुन अपघात नसून घातपाताची शक्यता असल्याचा संशय बळावला आहे.
अपघात झाला असता तर मृतदेह रस्त्याच्या अगदी कडेला असता. मात्र तो रस्त्यापासून काही अंतरावरील एका झाडाजवळ पडलेला आढळला. त्यातच मृतदेहाचे अवलोकन केले असता पोटावर चाकूने भोसकल्यासारख्या जखमा होत्या. यासोबतच चेहरा दगडाने ठेचून विद्रूप केल्यासारखे दिसून येत होते. अपघातात शक्यता चेहऱ्यावर ठेचल्यासारख्या जखमा होत नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र पोलिसांनी याप्रकरणी अपघाताची नोंद केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत मृतकाचे नातेवाईकांशी चर्चा केली असता त्यांनीही मृतदेहावरील जखमा आणि घटनास्थळाच्या अवलोकनावरुन अपघाताची शक्यता फेटाळून लावत हा घातपातच असल्याचा आरोप केला आहे. यामुळे सदर प्रकरणात पोलिसांच्या पुढील तपासावरच प्रश्नचिन्ह लागण्याची शक्यता बळावली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सुधाकर दाते हे शेतकऱ्यांकडून कापूस, सोयाबीन, चणा व गहू खरेदी करून ते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकायचे. मागील अनेक वर्षांपासून ते हा व्यापार करीत आहे. गुरुवारी ते सकाळी ७ वाजता घरून हिंगणघाटला जात असल्याचे सांगून निघून गेले. त्यानंतर दुपारी २.३० वाजताच्या सुमारास त्यांनी घरी फोन केला होता. तेव्हा त्यांनी सोरता येथून चुकारा घेऊन येत असल्याचे सांगितले. यानंतर मात्र ते घरी पोहचलेच नाही. ते घरी न पोहचल्याने घरची मंडळी चिंतेत होती. यानंतर घरच्या मंडळींचा त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नाही, असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. अशातच त्यांचा मृतदेह आढळल्याची वार्ता आज सकाळी घरी धडकली. माहिती मिळताच सकाळी ८ वाजताच्या सुमारास त्यांचे नातेवाईक घटनास्थळी पोहचले. यावेळी पोलिसांनी मृतदेह घटनास्थळावरुन हलविला होता. नातेवाईकांनी घटनास्थळाचे अवलोकन केले असता अपघाताची शक्यता त्यांना कुठेही वाटली नाही. यानंतर मृतदेहाचे अवलोकन केले असता मृतदेहावरील जखमाही अपघात झाल्यासारख्या वाटत नव्हत्या. इतकेच नव्हे, तर घटनास्थळी रक्ताचे डागसुद्धा नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सुधाकर दाते यांची हत्या करून त्यांचा मृतदेह त्या परिसरात आणून टाकला असावा, अशी शक्यताही नातेवाईकांनी ‘लोकमत’शी बोलताना वर्तविली. पोलीस या प्रकरणाचा तपास कसा करतात, याकडे मृतकाच्या नातेवाईकांचे लक्ष लागून आहे. या घटनेने त्यांचा गाव असलेल्या येळाकेळी येथे शोककळा पसरली आहे.(तालुका प्रतिनिधी)