शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
2
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
3
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
4
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
5
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
6
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
7
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
8
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
9
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
10
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
11
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
12
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
13
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
14
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
15
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
16
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
17
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
18
तामिळनाडूत मोठ्ठा 'खेला', ११८ साठी झगडणाऱ्या विजय यांना बहुमत चाचणीत १४४ आमदारांचा पाठिंबा! काय घडलं?
19
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत द्या

By admin | Updated: December 13, 2014 02:06 IST

यंदा खरीप हंगामात पावसाने हुलकावणी दिली़ यामुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीला सामोरे जावे लागले़ बी-बियाण्यांच्या खर्चाने ...

हिंगणघाट : यंदा खरीप हंगामात पावसाने हुलकावणी दिली़ यामुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीला सामोरे जावे लागले़ बी-बियाण्यांच्या खर्चाने शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. या संकटाचा सामना करण्याकरिता शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजू तिमांडे व शिष्टमंडळाने केली़ याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले़
नैसर्गिक संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. या स्थितीत सरकारने मदत करणे अत्यंत आवश्यक आहे़ पावसाच्या लपंडावामुळे सोयाबीन, कापुस, तूर आदी पिकांची पेरणी दीड महिना उशिराने करण्यात आली़ त्यामुळे उत्पन्न प्रभावित झाले. मध्यंतरीच्या कालावधीत पावसाच्या गैरहजेरीने कापुस, सोयाबीन, तुर पिके गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचे एकरी उत्पादन ५० किलोपासून मिळत आहे. अशी अल्प उतारी आल्यामुळे यंदाचा खर्च निघण्याची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. काही शेतकऱ्यांना शेतात गुरे सोडून सोयाबीनचे पीक सवंगणाचे कामच राहीले नाही़ यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली़ खरीप हंगामात कापसाच्या पिकाला पुरेसे पाणी मिळू शकले नाही़ त्यामुळे कपाशीची वाढ खुंटली आहे. जमिनीला भेगा गेल्या असून किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यंतरी धुक्यांमुळे कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव जाणवत आहे. तुरीच्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव असल्याने उत्पनाची हमी नाहीच. पावसामुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका सहन करावा लागला. फळांची काही झाडे सुकली आहे़ अशा स्थितीत शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे़ भारनियमनाने पाणी असताना ओलित होऊ शकत नाही़ पिकांना पाणी न मिळाल्याने पिके सुकत आहे. भारनियमन तातडीने बंद करण्यात यावे़, अशी मागणी करण्यात आली.
सरकारच्या धोरणाप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतातील कृषीपंपाचे वीज बील १०० टक्के माफ करण्यात यावे़ तसेच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने एकरी २५ हजार रूपयाची मदत देऊन दिलासा द्यावा, फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना एकरी १ लाख रूपयाची मदत जाहीर करावी़, अशी मागणी केली. यावेळी माजी आमदार प्रा. राजू तिमांडे, शशांक घोडमारे यासह कार्यकर्ते उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)