शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या

By admin | Updated: November 6, 2014 23:01 IST

देशात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रातील विदर्भात होत आहेत़ त्यातही पॅकेजग्रस्त वर्धा, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम या सहा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा वेग अधिक आहे.

मागणी : किसान मोर्चाचे मुख्यमंत्र्यांना निवेदनवर्धा : देशात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रातील विदर्भात होत आहेत़ त्यातही पॅकेजग्रस्त वर्धा, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम या सहा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा वेग अधिक आहे. दरवर्षी या जिल्ह्यात एक हजारपेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या करतात़ यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी किसान मोर्चाने केली़ याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही देण्यात आले़निवेदनात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही विदर्भातील जाहीर सभांमध्ये देण्यात आली होती़ २००६ मध्ये या पॅकेजग्रस्त जिल्ह्यात तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंह यांनी शेतकऱ्यांना व्याज माफीचे पॅकेज दिले होते; पण मुद्दल तशीच कायम राहिली़ त्यावर गत आठ वर्षांत पुन्हा तेवढेच व्याज झाले आहे. राज्य व केंद्र सरकारांना वारंवार निवेदने देऊनही विदर्भातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली नाही. या पॅकेजग्रस्त जिल्ह्यातील वर्धा व बुलढाणा जिल्हा सरकारी बँका डबघाइस आल्यात़ शेतकऱ्यांकडे या बँकांची किमान १५०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. कर्ज वसुलीसाठी बँक शेतकऱ्यांकडे जात असल्याने शेतकरी आत्महत्या वाढत आहेत़ या आत्महत्यांना नापिकी, कर्जाचा डोंगर, शेतमालाला अत्यंत कमी भाव व चुकीचे कृषी धोरण कारणीभूत आहे. या जिल्ह्यात सिंचन ४ टक्के आहे. यासाठी १५०० कोटी रुपयांचे पॅकेज केंद्र सरकारने त्वरित मंजूर करावे व शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्या, अशी मागणी प्रशांत इंगळे तिगावकर यांनी केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)