शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी तालुक्यात वनविभाग अव्वलस्थानावर

By admin | Updated: May 9, 2017 01:04 IST

दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामे सुरू केली. यामध्ये आष्टी वनविभागाला दिलेले उद्दिष्ट....

जलयुक्त शिवारची कामे शंभर टक्के पूर्ण : तहसीलदार व अधिकाऱ्यांकडून पाहणीलोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामे सुरू केली. यामध्ये आष्टी वनविभागाला दिलेले उद्दिष्ट कालावधी संपन्यापूर्वीच पूर्ण केल्यामुळे अव्वल स्थान प्राप्त झाले आहे. या सर्व कामांची पाहणी तहसीलदार सीमा गजभिये यांच्यासह अधिकाऱ्यांनी केली असून समाधान व्यक्त केले आहे. शासनाच्या उद्देशाचा गावपातळीवर लाभ होण्याचा मानस व्यक्त केला आहे.वन्य प्राणी असलेल्या या भागात वन्यप्राण्यांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून जंगलात पाणवठे तयार करण्यात आले होते. त्यामुळे काहीसा दिलास मिळाला होता. यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी जंगलात जलयुक्त शिवार अभियाने राबविण्याचा निर्णय घेतला. तसा प्रस्ताव तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. वर्धा वनिवभागाचे उपवनसंरक्षक डी. डब्ल्यू पगार यांनीही सहकार्य केले. या कालावधीपूर्वीच सर्व कामे तातडीने पूर्ण करून चौधरी यांनी आदर्शन घालून दिला आहे. त्यांनी पिलापूर रोपवाटिकामध्ये दोन लाख रोपटे तयार केले. शासनाचा निधी मनरेगा योजनेतून वापरून सर्व मजुरांना काम मिळवून दिले. जलयुक्त शिवार अभियानात कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यावर्षी आष्टी तालुक्यात पाणी साठवणमध्ये मोठा फायदा होणार आहे. अशाच प्रकारची कामे इतर विभागाने करून दाखविण्याची गरज व्यक्त होत आहे. या कामामुळे वनविभागाच्या कामाची सर्वत्र चर्चा होत आहे. सर्व कामे कमी वेळात पूर्ण करून वनपरिक्षेत्र अधिकारी चौधरी यांनी आदर्श घालून दिला. यावर वनविभाग पूर्णपणे समाधानी आहे. इतरही वनपरिक्षेत्रात अशाच धर्तीवर नियोजनाच्या सूचना दिल्या आहेत.-डी.डब्ल्यू. पगार, उपवनसंरक्षक वनविभाग, वर्धा