शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
2
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
3
Top Marathi News LIVE: लाडक्या बहिणींना ३००० रुपये, मोफत बस सेवा; पश्चिम बंगाल सरकारने घेतले मोठे निर्णय 
4
Twisha Sharma : Video - "माझी मुलगी शूर होती, सासरचे..."; ट्विशाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
5
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
6
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
7
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
8
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
9
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
10
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
11
जेव्हा सापाने खलनायकाच्या जिभेलाच दंश केला! शूटिंग सेटवर क्षणात पसरला 'सन्नाटा'; असा घडला होता थरार 
12
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
13
Twisha Sharma : "हे लोक खूप घाणेरडे, निर्दयी, माझ्या पोटात कोणाचं मूल..."; ट्विशाचं आईसोबत शेवटचं चॅट
14
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
15
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
16
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
17
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
18
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
19
"लोक फक्त फोटो काढत राहिले, पण तिने त्याची भूक ओळखली अन्..."; काळजाला भिडणारा Video
20
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

निम्न वर्धा प्रकल्प घेतला केंद्राने दत्तक

By admin | Updated: April 13, 2016 02:20 IST

केंद्राच्या पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्प केंद्र शासनाने दत्तक घेतला आहे.

रामदास तडस : ६२९ कोटींची तरतूद, २०१७ पर्यंत होणार पूर्ण कामे
आर्वी : केंद्राच्या पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्प केंद्र शासनाने दत्तक घेतला आहे. या प्रकल्पातील रखडलेल्या कामासाठी केंद्राच्या बजेटमध्ये ६१९ कोटींची तरतूद केली आहे. २०१७ पर्यंत या प्रकल्पाची रखडलेली संपूर्ण कामे पूर्ण केली जाणार आहेत, असे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.
राजापूर येथील बाकळी नदीवरील मोठ्या पुलाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. ६० हजार हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या प्रकल्पाचे काम अनेक वर्षांपासून रखडल्याने ५ टक्केच्या वर खर्च झाला, ते सर्व प्रकल्प केंद्र शासनाने दत्तक घेतल्याची माहिती यावेळी खा. तडस यांनी दिली. खेडी विकसित होण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींना ८० लाखांचा निधी देण्याची तरतूद आहे. प्रत्येक तालुका स्तरावर शेतमाल तारण ठेवण्यासाठी ‘कोल्ड स्टोरेज सेंटर’ची निर्मिती करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दादाराव केचे तर अतिथी म्हणून पं.स. उपसभापती बाळा नांदूरकर, सदस्य वैभव जगताप, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद हिवाळे, शहराध्यक्ष मिलिंद डोळे, माजी खासदार विजय मुडे, राजापूरचे सरपंच प्रा. धर्मेंद्र राऊत, ग्रा.पं. सदस्य दिनेश डेहनकर यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
यावेळी केचे यांनी निम्न वर्धा प्रकल्प बाधित २४ गावांसाठी नागरी सुविधा झाल्या आहे. यात प्रकल्पग्रस्तांची कामे मार्गी लागणार असून उर्वरित मतदार संघाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. मुडे, नांदूरकर यांनीही विचार व्यक्त केले. याप्रसंगी राजेश सोळंकी, विजय जयस्वाल यांचाही गौरव करण्यात आला. संचालन करीत आभार गजानन भोरे यांनी मानले. यावेळी उपसरपंच राम सावतकर, सदस्य योगेश ठाकरे, नलिनी ढेपे, सरिता उल्हे, शांता, प्रवीण उईके व ग्रामस्थ हजर होते.(तालुका प्रतिनिधी)