शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
3
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
4
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
5
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
6
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
7
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
8
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
9
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
10
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
11
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
12
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
13
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
14
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
16
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
17
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
18
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
19
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
20
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 12:19 IST

अल्पसंख्याक समाजासंदर्भात बोलताना जॉर्ज म्हणाले, भारतात प्रत्येक अल्पसंख्याक समुदाय सुरक्षित आणि आनंदाने राहतो. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशात अल्पसंख्यकांची लोकसंख्या ११ टक्के होती, जी आज २० टक्के पार गेली आहे."

देशातील प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांमध्ये घसरण झाल्याचे आरोप भारताने रविवारी पूर्णपणे फेटाळून लावले. भारत हा एक जिवंत लोकशाही असलेला देश आहे. येथे प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी आहे, असे भारताने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय नेदरलँड दौऱ्यावर होते. त्यावेळी तेथील पंतप्रधान रॉब जेटेन यांनी, भारतातील कथित परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, परराष्ट्र मंत्रालयाचे (पश्चिम) सचिव सीबी जॉर्ज यांनी स्पष्ट आणि सडेतोड उत्तर दिले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना सीबी जॉर्ज म्हणाले, "हा प्रश्न विचारणाऱ्याच्या समजेच्या आभावामुळे आम्हाला उत्तर द्यावे लागत आहे. भारत हा १.४ अब्ज लोकसंख्या असलेला  देश आहे. या देशाची संस्कृती ५ हजार वर्षं जुनी आहे. येथे प्रचंड विविधता आहे. जगात असा एकही देश नाही, जेथे हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धर्मांसारखे अनेक धर्म उदयाला आले असतील. ते आजही येथे वाढत आहेत." एवढेच नाही तर, भारत कदाचित मोजक्या देशांपैकी एक आहे, जेथे ज्यू समाजाला कधीही छळाला सामोरे जावे लागले नाही, असेही जॉर्ज यांनी सांगितले.

स्वातंत्र्यावेळी ११% असलेले अल्पसंख्याक आज २०% पार! -
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचा हवाला देत जॉर्ज म्हणाले, "भारताने लोकशाही मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. मात्र तरीही आर्थिक यश मिळवले. आम्ही गरिबीवर मात करण्यासाठी हिंसेचा नव्हे तर लोकशाहीचा मार्ग निवडला. आम्ही जगाच्या लोकसंख्येचा एक षष्ठांश भाग आहोत. मात्र, जगातील समस्यांचा भाग नाही. हेच भारताचे सौंदर्य आहे." अल्पसंख्याक समाजासंदर्भात बोलताना जॉर्ज म्हणाले, भारतात प्रत्येक अल्पसंख्याक समुदाय सुरक्षित आणि आनंदाने राहतो. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशात अल्पसंख्यकांची लोकसंख्या ११ टक्के होती, जी आज २० टक्के पार गेली आहे."

दरम्यान, पंतप्रधानांच्या दौर्यात, पंतप्रधान मोदी आणि डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्यात धोरणात्मक भागीदारी वाढवण्यावर आणि विविध करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. तसेच, भारतासाठी नेदरलँड हा एक अत्यंत महत्त्वाचा भागीदार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : India Rejects Concerns Raised by Dutch PM on Minority Rights.

Web Summary : India strongly refuted concerns about media freedom and minority rights. India, a vibrant democracy, guarantees freedom of expression. Religious diversity thrives; minorities are safe, their population increasing since independence. Strategic partnership with Netherlands strengthened.
टॅग्स :IndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी