शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पूर व वादळाचा तडाखा

By admin | Updated: July 23, 2014 23:46 IST

वादळी पावसाचा तालुक्यातील सर्व गावांना फटका बसला़ यात मोठे नुकसान झाले़ बोरगाव-आलोडा, सरुळ-वायगाव तसेच देवळी ते डिगडोह, नांदोरा व मुरदगाव या पुलावरील वाहतूक यशोदा

यशोदा नदीच्या पुरामुळे वाहतूक ठप्प; घरांची पडझड, शेतीही खरडलीदेवळी - वादळी पावसाचा तालुक्यातील सर्व गावांना फटका बसला़ यात मोठे नुकसान झाले़ बोरगाव-आलोडा, सरुळ-वायगाव तसेच देवळी ते डिगडोह, नांदोरा व मुरदगाव या पुलावरील वाहतूक यशोदा नदीच्या पुरामुळे बुधवारी दुपारपर्यंत बंद होती. यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ नदी व नाल्यांचे पाणी शेतात गेल्याने शेतांना तलावाचे स्वरुप आले़ पुरामुळे शेते खरडून गेली व पिकांचे नुकसान झाले. सोयाबीन बियाणे जमिनीत सडले तर कपाशीचे पीक पूर्णत: पाण्याखाली आल्याने नुकसान झाले. झाडे पडून घरांची पडझड झाली. बुधवारी सकाळपर्यंत १३१ मिमी पावसाची नोंद झाली़तीन तालुक्यांत दोन दिवस वीज गुल; अनेक मार्ग बंदआष्टी (श़) - सततच्या पावसामुळे आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील वीज मंगळवार रात्रीपासून बंद होती़ यामुळे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले होते़ कारंजा येथील वीज पुरवठा पहाटे ४ वाजता तर आष्टीची वीज रात्री १ वाजेपासून बंद होती़ तळेगाव ते आष्टी मार्गावर झाडे पडल्याने रात्रीपासून बुधवारी दुपारपर्यंत वाहतूक ठप्प होती़ जाम नदीच्या पुरामुळे आष्टी ते साहूर मार्ग बंद होता़ जाम, बाकळी व कड नदीला पूर आल्याने परिसरातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ सर्वाधिक नुकसान साहूर परिसरात झाल्याची नोंद आहे़मनसावळी ते कापसी मार्ग ठप्पहिंगणघाट - संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले ठप्प झाली़ २४ तासांत तालुक्यात ११४़४० मि.मी. तर एकूण ४०१ मिमी पाऊस झाला़ पावसामुळे वर्धा, यशोदा, वणा, पोथरा, लाल नाला आदींसह नाले दुथड्या वाहत आहे़ यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे मनसावळी ते कापसी रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती़ संततधार पावसामुळे शासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालयातील उपस्थिती रोडावली व बाजारपेठाही ओस होत्या़ तालुक्यात ९३ गावांची पडझडसमुद्रपूर - तुडूंब भरलेल्या लाल नाला धरणाची ५ दारे खुले करण्यात आली़ पोथरा धरण ओव्हरफ्लो झाले़ बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत तालुक्यात १२७ मिमी तर एकूण ३९१.३ मिमी पावसाची नोंद झाली़ वाघाडी नदीच्या पुलावरून पाणी असल्याने वर्धा-समुद्रपूर मार्ग सकाळी ४ तास बंद होता. मार्डा येथे १० कुटुंबांना प्राथमिक शाळेत हलविण्याची तयारी होती; पण पाऊस थांबल्याने प्रक्रिया रोखली़ डोंगरगाव, आसोला व कोरा परिसरात काही गावांना सतर्कतेचा इशारा दिला़ वाघाडी नदीचे पाणी शेतांत पाणी शिरल्यासने पिकांचे नुकसान झाले. चारमंडळ येथे ५० घरांचे अंशत: तर अंतरगाव, घोरपड, चापापूर, वानरचुआ, सावंगी, लोखंडी, वाघेडा, सायगव्हान, धोंडगाव, समुद्रपूर, वायगाव (ह.), रेणकापूर, निंभा, बोडखा, मुरादपूर, पाइकमारी आदी गावांतील एकूण ४३ घरांची अंशत: पडझड झाली़ कारंजा तालुक्यात १९३ घरांची पडझडतालुक्यात १९३ घरांची अंशत: पडझड झाली़ यात कारंजा मंडळात ५६, सारवाडी ४९, ठाणेगाव ३३, कन्नमवारग्राम ४५ घरांची पडझड झाली़ यात ५ लाखांचे नुकसान झाले़ तहसीलदार बालपांडे यांनी बिहाडी, वाघेडा, काकडा, सेलगाव (ल़) गावांना भेटी देत आढावा घेतला़ ६८ गावांतील शेतांना फटका बसला़ बांध फुटल्याने शेती खरडली़ मंगळवारी सायंकाळी १७ टक्के असलेला खैरी धरणाचा जलसाठा बुधवारी दुपारी ९० टक्क्यांवर पोहोचला़