शहरं
Join us  
Trending Stories
1
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
2
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
3
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
4
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
5
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
6
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
7
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
8
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
11
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
12
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
13
फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
14
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
15
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
16
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
17
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
18
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
19
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
20
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

निम्न वर्धाची पाच दारे उघडली

By admin | Updated: August 5, 2015 02:06 IST

जिल्ह्यात सोमवारी दुपारपासून दमदार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस रात्रभर सुरू असल्याने आठही तालुक्यात सरासरी २९६.५० मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

दमदार पाऊस : बळीराजा सुखावला
वर्धा: जिल्ह्यात सोमवारी दुपारपासून दमदार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस रात्रभर सुरू असल्याने आठही तालुक्यात सरासरी २९६.५० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. ही नोंद मंगळवारी सकाळची असून दिवसभर पाऊस सुरूच होता. यामुळे दुपारी ३ वाजताच्या सुमारास निम्न वर्धा धरणाची पाच दारे २२ सेंटीमिटरने उघडण्यात आली. यातून ६२ क्यूसेक पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती आहे.
सोमवारी रात्रीपासून सुरू असलेला पाऊस मंगळवारी दुपारीही सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी कमी उंचीच्या नाल्यावरून पाणी गेल्याने नागरिकांना पाणी ओसरण्याची वाट पाहावी लागली. वर्धा शहरातील रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणी साचल्याचे दिसून आले आहे. तर बॅचलर मार्गावरील न्यू आर्टस् महाविद्यालयाजवळही पाणी साचले होते. याचा त्रास या मार्गाने जात असलेल्या नागरिकांना सहन करावा लागला. तर हवालदारपूरा येथील जनार्धन पाटील यांच्या घराशेजारी असलेल्या एका जुन्या इमारतीची भिंत कोसळली. यात कुठलीही प्राणहानी झाली नसली तरी पाटील यांच्या घरात तिचा मलबा पडला आहे.
तळेगाव (श्यामजीपंत) येथील राष्ट्रीय महामार्गावरील पाणी शेतात शिरले. याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागणार असल्याचे दिसत आहे. हमदारपूर मार्गावर असलेल्या कमी उंचीच्या पुलावरून पाणी गेल्याने नागरिकांना पाणी ओसरण्याची प्रतीक्षा करावी लागली. जिल्ह्यातील काही भागात पाणबसण जमिनीत पाणी साचल्याने उभी असलेली पिके पिवळी पडण्याचा धोका उद्भवण्याचे संकेत शेतकऱ्यांनी दिले आहेत.
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आलेला हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर असला तरी सर्वाधिक पाऊस वर्धा तालुक्यात पडल्याची नोंद आहे. वर्धा तालुक्यात ५९ मिमी. पावसाची नोंद झाली आहे.
गत १५ दिवसांपूर्वी बऱ्याच प्रतीक्षेनंतर पाऊस आला. त्यावेळी आलेला पाऊस मरणासन्न अवस्थेत असलेल्या पिकांकरिता संजीवनी ठरला. त्या काळापासून पाऊस बेपत्ता झाला. तो सोमवारी दुपारपासून बरसला आहे. त्याची धार मंगळवारी सायंकाळपर्यंत सुरूच होती. हा पाऊस असाच सुरू राहिला तर निम्न वर्धा धरणाची आणखी दारे उघडण्याची वेळ येवू शकते असे तेथील अभियंत्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सुरू असलेला पाऊस असाच राहिला तर जलसाठ्यांची खालावलेली पातळी लवकरच भरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गत २४ तासात जिल्ह्यात एकूण २९६.५० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. सरासरी ३७.०६ मि.मी. एवढा पाऊस झालेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३ हजार ७२०.१५ मि.मी. पाऊस झाला असून सरासरी ४६५.०२ एवढा पाऊस झाला आहे.
२४ तासात वर्धा तालुक्यात सर्वाधिक ५९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात ४६५.०२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.
तालुका पाऊस मिमी
वर्धा ५९.००
सेलू११.००
देवळी४४.००
हिंगणघाट२८.३०
समुद्रपूर ४३.००
आर्वी ३५.००
आष्टी५१.४०
कारंजा२४.८०