शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांच्या उत्तम सेवेसाठी पहिल्यांदाच अभियंत्यांचा एल्गार

By admin | Updated: September 21, 2015 01:53 IST

महावितरणच्या वर्धा विभागात सुमारे दीड लाख ग्राहक आहेत.

मागण्यांकडे दुर्लक्ष : साहित्य, मनुष्यबळ पुरविण्यास असमर्थतावर्धा : महावितरणच्या वर्धा विभागात सुमारे दीड लाख ग्राहक आहेत. या ग्राहकांना सेवा देताना अभियंत्यांची दमछाक होते. अपूऱ्या व्यवस्थेमध्ये ही सेवा प्रदान करावी लागत असल्याने अडचणीचे ठरते. महावितरणकडून अभियंत्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे आता अभियंत्यांनीच महावितरणविरूद्ध एल्गार पुकारला आहे. ग्राहकांना उत्तम सेवा प्रदान करण्याकरिता बहुदा पहिल्यांदाच अभियंते आंदोलनाची तयारी करताना दिसताहेत.महावितरणचे वर्धा विभागात वर्धा, सेलू व देवळी असे तीन तालुके आहेत. या तीन तालुक्यांमधील सुमारे दीड लाख ग्राहकांना सेवा दिली जाते. महावितरणचे हे जाळे जुने असून जीर्ण झाले आहे. त्यातही नियमित सुव्यवस्था न झाल्याने ग्राहकांना सेवा पुरविणे कठीण झाले आहे. याबाबत प्रशासनाला मागणी करूनही विद्युत लाईनची सुव्यवस्था करण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जात नाही. तोकडे साहित्य उपलब्ध करून दिले जाते. यामुळे ग्राहकांना अखंडित विद्युत पुरवठा व उत्तम सेवा देणे अशक्य झाले आहे. अनियमित व खंडित वीज पुरवठ्यामुळे ग्राहकांचा रोष मात्र विभागीय तथा उपविभागीय अभियंत्यांवरच असतो. अनेकदा अभियंत्यांना शिवीगाळ व धक्काबुक्कीच्या प्रकारांनाही सामोरे जावे लागते. महावितरणने साहित्य व मनुष्यबळ पुरविल्यास लाईनची दुरूस्ती करून ग्राहकांना अखंडित सेवा देणे शक्य आहे; पण त्याकडे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करतात. महावितरणने योग्य साहित्य व मनुष्यबळ पुरवावे, या मागणीसाठी सबआॅर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन वर्धा यांनी एल्गार पुकारला आहे. महावितरणच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्राहकांच्या उत्तम सेवेसाठी अभियंते आंदोलनाच्या तयारीत आहेत. याबाबत कार्यकारी अभियंत्यांना नोटीसही देण्यात आली आहे. शिवाय वर्धा विभागातील सुमारे ४० अभियंत्यानी साखळी उपोषण करण्याचाही निर्णय घेतला आहे. सध्या वर्धा विभागात हे आंदोलन होत असून कारवाई न झाल्यास सर्वच विभागात होणार आहे. ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारे महावितरण अभियंत्यांच्या आंदोलनाची दखल घेणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)