शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

व्यापाऱ्यांचा शेतमाल यार्डात शेतकऱ्यांचा रस्त्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 6:00 AM

व्यापाऱ्यांचा शेतमाल मार्केट यार्डात टाकण्यात आल्याने शेतकऱ्यांना मात्र शेतमाल रस्त्यावर टाकावा लागला आहे. अगोदरच परतीच्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. पाऊस येण्याची शक्यता असल्याने विक्रीसाठी आणलेला शेतमालही पाण्याने भिजण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांत असंतोष : वर्धा बाजार समितीचे व्यापारीधार्जिणे धोरण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाचे धोरण नेहमीच व्यापारीधार्जिणे राहिले आहे. शेतकºयांच्या हिताची जपवणूक करण्याऐवजी नेहमीच व्यापारी हित जोपासणाऱ्या बाजार समितीने पुन्हा एकदा शेतकºयांना अडचणीत आणले आहे.व्यापाऱ्यांचा शेतमाल मार्केट यार्डात टाकण्यात आल्याने शेतकऱ्यांना मात्र शेतमाल रस्त्यावर टाकावा लागला आहे. अगोदरच परतीच्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. पाऊस येण्याची शक्यता असल्याने विक्रीसाठी आणलेला शेतमालही पाण्याने भिजण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.येथील बाजार समितीचे उत्पन्न बऱ्यापैकी आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या खरेदी विक्रीतून बाजार समिती प्रशासनाला चांगले उत्पन्न मिळते. मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा मात्र दिल्या जात नाहीत. पिण्याच्या पाण्यासह इतर सुविधा सुरळीत राहत नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करताना दिसतात. मागील आठवडाभरापासून शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने मार्केट यार्डात शेतमाल ठेवणे गरजेचे आहे. मात्र, यार्डात व्यापाऱ्यांच्या शेतमालाची पोती ठेवून आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना आपला शेतमाल रस्त्यावर इतरत्र टाकावा लागतो.अचानक पाऊस आल्यास शेतमाल भिजत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांचा शेतमाल टाकण्याकरिता शेड आहे. असे असताना यावर व्यापाऱ्यांनीच कब्जा केल्याने शेतकऱ्यांत संतापाची लाट असल्याचे या परिसरात फेरफटका मारल्यावर आढळून आले. याकडे बाजार समिती प्रशासनाचा कानाडोळा असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.समितीतील ओट्याला शेडची प्रतीक्षाबाजार समितीत लगतच्या ग्रामीण भागातून शेतमाल आणला जातो. आवक वाढल्यानंतर यार्ड आणि खुली जागाही अपुरी पडते. याकरिता काही वर्षांपूर्वी भला मोठा ओटा तयार करण्यात आला. मात्र, त्यावर कित्येक वर्षांपासून शेड उभारण्यात आले नाही. ओट्यावर गवताचे पीक आले असून कचऱ्यांने विळखा घातल्याचे दिसून येते. स्वच्छतेकडे बाजार समिती प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड