नाशिक : वारकरी संप्रदायातील काही मंडळींनी ‘मातोश्री’ गाठून विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यानंतर वारकरी संप्रदायात त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, संप्रदायाचे नेतृत्व करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी वारकरी संप्रदाय हा कुणा पक्षाचा पुरस्कर्ता नसल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय ‘मातोश्री’वर जे कोणी वारकरी म्हणून गेले असतील त्यांच्या मतांशी वारकरी संप्रदाय सहमत नसून त्यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकेला आक्षेप घेण्यात आला आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}