शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीबद्दल अर्वाच्च बोलल्यामुळे घडले कुटकीचे दुहेरी हत्याकांड ?

By admin | Updated: August 23, 2015 02:13 IST

जून महिन्यात उजेडात आलेल्या कुटकी येथील दुहेरी हत्याकांडाचे रहस्य उलगडविण्यात सेवाग्राम पोलिसांना यश आले आहे.

मारेकरी दोन : बंगळुरू येथून आठ जणांना घेतले ताब्यात वर्धा : जून महिन्यात उजेडात आलेल्या कुटकी येथील दुहेरी हत्याकांडाचे रहस्य उलगडविण्यात सेवाग्राम पोलिसांना यश आले आहे. सदर हत्याकांड मारेकऱ्याच्या पत्नीला अर्वाच्च भाषेत बोलल्याने घडल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. हत्या करणाऱ्या दोघांसह एकूण आठ जणांना पोलिसांनी बंगळुरू येथून ताब्यात घेतले आहे. यात तीन पुरूष व पाच महिलांचा समावेश आहे. त्यांची विचारपूस सुरू असल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.हत्याकांडातील आरोपी हाती आले तरी मृतकांची ओळख पटने शक्य झाले नाही. असे असले तरी या हत्या प्रकरणात आढळलेले दोनही मृतदेह पुरूषांचाचेच असल्याचा उलगडा मात्र येथे झाल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत यातील एक पुरूष व एक स्त्री असल्याची चर्चा जोरात होती. ताब्यात घेण्यात आलेल्या आठ पैकी दोघांनी हे हत्याकांड घडवून आल्याचे सुत्राकडून सांगण्यात आले आहे. या दोन मुख्य आरोपीसह अन्य सहा जणांनाही चौकशीकरिता पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून प्रकरणाचे सत्य उलगडण्याचे प्रयत्न सुरू आहे. मुख्य मारेकऱ्यासह फरार असलेले इतर नागरिक या प्रकरणाचे साक्षिदार असल्याचे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांना अद्याप अटक करण्याची कारवाई सुरूच होती. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येच्या दिवसापासून हे दोघे पारधी बेड्यावरून फरार झाल्याचे दिसून आले होते. हत्या प्रकरण उघड होताच तपास सुरू असतानाच अंबानगर येथील बेड्यावरील इतरही फरार झाले. यामुळे पोलिसांचा या दोघांवर संशय पक्का झाला होता. त्यांचा शोध सुरू असताना ते बंगळुरू येथे असल्याचे कळले. यावरून सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. सुत्रांच्या माहितीनुसार, मारेकरी व मृतक यांच्यात मे महिन्यात पत्नीच्या कारणावरून वाद झाला. या वादातून हे हत्याकांड घडल्याची माहिती हाती आली आहे. शिवाय हत्या करण्यापूर्वी मारेकऱ्यांनी मृतकांना यथेच्च दारू पाजल्याचेही समोर येत आहे. दारूच्या नशेत असलेल्या दोघांवरही लाकडी काठीने वार करून संपविण्यात आले. त्याचा पुरावा नष्ट करण्याकरिता या दोघांचे मृतदेह पोत्यात बांधून बेड्यानजीक असलेल्या शेतात नेत पुरल्याचे ताब्यातील संशयीत सांगत असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. या आरोपींच्या मागावर राहून त्यांना सेवाग्राम ठाण्यात आणण्याची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक रेखा साळवे, जमादार रामदास बिसणे, अमोल भिवापुरे, चालक अजय वाखेडे व महिला पोलीस पंचशिला कांबळे यांनी पार पाडली.(प्रतिनिधी) दोन्ही मृतदेह पुरूषांचेच जून महिन्यात उघड झालेल्या या हत्याकांडात दोन मृतदेह आढळून आले होते. यातील एक मृतदेह पुरूषाचा व दुसरा स्त्रीचा असल्याचे बोलले जात होते. मात्र मारेकरी ताब्यात येताच ते दोन्ही मृतक पुरूषच असल्याचे समोर आल्याने स्त्री - पुरूष वादावर पडदा पडला आहे. दारूच्या नशेत संपविले मे महिन्यात घडलेल्या या हत्या प्रकरणात पत्नीला अर्वाच भाषेत बोलण्याचे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे. याच कारणावरून रात्री दोनही मारेकऱ्यांनी मृतकाला दारू पाजून त्यांच्यावर वार केल्याचे समोर येत आहे. मृतकांचीही ओळख पटणे शक्यपारधी बेड्यावरील सर्वच रहिवासी बेपत्ता झाल्याने मृतकांचीही ओळख पटविणे पोलिसांना कठीण जात होते. संशयीतांना ताब्यात घेताच त्यांचीही ओळख पटने शक्य झाले आहे.भाषा आली कामीया प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना भाषेची अडचण जात होती. यामुळे सेवाग्राम ठाण्यातील एका महिला अधिकाऱ्याला येत असलेली भाषा येथे कामी आली.