शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फळांबाबत ग्राहकांमध्ये केवळ गैरसमज

By admin | Updated: May 10, 2015 01:39 IST

डॉक्टर्स नेहमीच आहारात भरपूर फळे खाण्याचा सल्ला देतात.

पराग मगर वर्धाडॉक्टर्स नेहमीच आहारात भरपूर फळे खाण्याचा सल्ला देतात. परंतु बदलते वातावरण आणि वाढती मागणी यामुळे ही फळे रसायनांनी पिकवली जात असावी, असा नागरिकांना समज असतो. यात सत्यता किती हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने वर्धा शहरातील फळाचे मुख्य व्यापारी व वर्धा फुड मर्चंट असोसिएशनच्या सदस्यांची भेट घेऊन तसेच येथील फळे पिकवित असलेल्या स्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी व्यापारी सदस्यांनी या प्रक्रियेबद्दल असलेल्या गैरसमजाविषयी असलेल्या भावना व्यक्त करीत अतिशय नैसर्गिक पद्धतीने ही फळे पिकविल्या जात असल्याचे सांगितले. वर्धा शहरात इतवारा परिसरात असलेल्या वर्धा फुड मर्चंट असोसिएशनच्या माध्यमातून शहरात हंगामी फळांचा पुरवठा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात केला जातो. यात मुख्यत्वे पपई, केळी, आंबा, तरबूज अशा फळांचा समावेश असतो. आंब्याचे उत्पादन जिल्ह्यात होत नसल्याने त्याची आयात केली जाते. कच्चा आंबा मागवून तो पिकविला जातो. त्यामुळे तो पिकवताना रसायनांचा वापर केला जात असावा असा सामान्यांचा नेहमीचा समज असतो. परंतु वास्तव वेगळे असून केवळ गैरसमजामुळे आम्ही बदनाम असल्याचे हे व्यापारी सांगतात. फळांना इंजेक्शन कधीच दिले जात नाहीपपई, टरबूज आदी फळे पिकविताना तसेच त्यांना चांगला रंग येण्यासाठी इंजेक्शन टोचले जातात असाही समज नागरिकांमध्ये आहे. वास्तविकता, जर या किंवा कोणत्याही फळाला इंजेक्शन किंवा कुठलीही वस्तू टोचल्यास ही फळे दोन ते तीन तासातच खराब होतात. त्यामुळे असे कुठलेही इंजेक्शन दिले जात नसल्याचेही फळव्यापारी सांगतात. पपई, टरबूज आदी फळे ही पिकण्याच्या तयारीत असतानाच शेतकऱ्यांकडून घेतली जातात. उन्हाळ्यात ती लवकरच पिकतात. त्यामुळे ती रसायनाने पिकविण्याचा प्रश्नच नसतो असेही व्यापारी सांगतात. जिल्ह्यात आंध्र प्रदेशमधून आंब्याची आयात केली जातो. केवळ बेगमपल्ली आंब्याचीच आयात केली जात आहे. दररोज जवळपास १२ टन आंब्याची आवक होत असते. यातील पाच ते सहा टन आंब्याची विक्री होत असते. आणलेल्या कच्च्या आंब्याची सर्वप्रथम पाहणी केली जाते. त्यानंतर दोन दिवस या आंब्याचा गरम जागेत माच घातला जातो. त्यानंतर हे आंबे कॅरेटमध्ये कागद पसरवून त्यामध्ये भरले जातात. यानंतर एका उबदार खोलीत हा आंबा पाच दिवसांसाठी व्यवस्थित झाकून ठेवला जातो. त्यानंतर सहाव्या दिवशी हा आंबा उघडला जातो. त्यानंतर पुन्हा सर्व आंब्यांची एकदा तपासणी करून तो विक्रीसाठी तयार होतो.