शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वणा नदीचे पाणी देण्यास सर्वांचाच विरोध

By admin | Updated: May 1, 2015 23:57 IST

उत्तम गॅल्वा मेटॅलिक लिमिटेडला पाईपलाईनद्वारे भूगावला पाणी देण्यास स्थानिक जनतेचा तीव्र विरोध असला तरी शासन प्रशासन मात्र मूग गिळून आहेत.

पाणी पेटले : उत्तम गॅल्वा कंपनीने पाईपलाईन टाकण्याच्या कार्याला दिली गतीहिंगणघाट : उत्तम गॅल्वा मेटॅलिक लिमिटेडला पाईपलाईनद्वारे भूगावला पाणी देण्यास स्थानिक जनतेचा तीव्र विरोध असला तरी शासन प्रशासन मात्र मूग गिळून आहेत. याउलट उत्तम गॅल्वा ने पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या कार्याला गती दिली असल्याने वणेचे पाणी पेटत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. येथील वणा नदीतून भूगावच्या उत्तम गॅल्वा कंपनीला ८.७६ दलघमी पाणी उचलण्याची परवानगी २०१० मध्ये देण्यात आली. त्यावेळेस कोणत्याही हरकती न मागता पूर्व शासनाने सरळसरळ संमती देवून हा प्रश्न जनतेपासून अंधारात ठेवल्याचा आरोप केला जात असून वणेचे पाणी कंपनीला देण्यास सर्वत्र विरोध केला जात आहे. राज्य शासनाने ती परवानगी रद्द करावी. अशीच मागणी नगर सिधार समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी महाराष्ट्र शासन, मंत्रालय यांनाही देण्यात आल्या आहेत.(शहर प्रतिनिधी) जुना निर्णय रद्द करण्याची तालुकावासियांची मागणीमहात्मा फुले समता परिषदसार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेली पाण्याची पाईपलाईन टाकण्याची परवानगी तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी समता परिषदेच्या वतीने करण्यात आली.नगर विकास सुधार समितीनदीचे वाहते पाणी पिण्याच्या पाण्यासाठी, शेतीसाठी आणि गुराढोरांसाठी संरक्षित करण्याची मागणी केली. नगर विकास सुधार समितीच्या वतीने करण्यात आली. जनसुनावणी न घेतात दिली परवानगीजनतेला विश्वासात न घेता करार करून शासनाने परवानगी देवून जनतेशी विश्वासघात केला. याबाबतची जनसुनावणी न करता ही परवानगी दिली गेली. नियमबाह्य पद्धतीने परवानगी दिली असल्याने ती परवानगी रद्द करावी अशी मागाणी आम आदमी पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांनी, विविध पक्षाच्या प्रमुखांनी याविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार मोहीम छेडली आहे. त्यामुळे दिलेली परवानगी रद्द करावी आणि सध्या कंपनीने पाईप लाईन टाकण्याचे सुरू केलेले कार्य थांबवावे, अशी ही मागणी होत आहे. हिंगणघाट शहराला पाणीपुरवठा कमी पडल्यास न. प. लाखो रूपये खर्च करून पाटबंधारे विभागामार्फत पाणी विकत घेते. परिसरातील शेतीला व शहराला पाण्याची जास्त गरज आहे. त्यामुळे वणा नदीतून भूगावच्या कंपनीला पाणी पुरवण्याची परवानगी देवू नये राजू तिमांडे, माजी आमदार, हिंगणघाटजनतेच्या दृष्टीने तो निर्णय अन्यायकारक असून मागील शासनाने हा निर्णय घेतलेला होता. यावर फेरविचार करून जुना निर्णय रद्द करावा. न.प.चा अध्यक्ष म्हणून माझा पाणी देण्यास पूर्ण विरोध आहे. पाण्याची सदर परवानगी लवकरात लवकर रद्द करावी, पंढरीनाथ कापसे, नगराध्यक्ष, नगरपालिका हिंगणघाटवणा नदी या भागासाठी जीवनदायिनी असून तालुक्यातील नागरिकांना ती पिण्याचे पाणी उपलब्ध करून देते. नदी किनाऱ्यावरील अनेक गावांचा पाणी पुरवठा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या सिंचनाची गरज नदी पूर्ण करते. रोजगार निर्मिती करण्यासाठी स्थानिक उद्योगाची गरज असून त्यासाठी पाणी आवश्यक आहे. उन्हाळ्यात नदीला फार कमी पाणी असते. नेमकी त्याच वेळेस पाण्याची मागणी वाढते. येथेच पाणी उन्हाळ्यात अपुरे पडत असल्याने येथून पाणी आम्ही कंपनीला जावू देणार नाही. याप्रकरणीचौकशी सुरू असून ही परवानगी फार पूर्वी तत्कालीन महाराष्ट्र शासनाने दिली असून ती रद्द करावी.आ. समीर कुणावार, हिंगणघाट