शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीच्या शिवाजी चौकात फेरीवाल्यांचे अतिक्रमण

By admin | Updated: April 24, 2016 02:20 IST

शहराची वाढती लोकसंख्या व आर्वी परिसरात तालुक्यातील गावांचा होत असलेला विस्तार यामुळे रहदारीचे रस्ते

वाहतुकीचा बोजवारा : वाहन चालकांना मनस्तापआर्वी : शहराची वाढती लोकसंख्या व आर्वी परिसरात तालुक्यातील गावांचा होत असलेला विस्तार यामुळे रहदारीचे रस्ते सध्या शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातच शहरातील मुख्य रस्ता असलेल्या शिवाजी चौकात फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाने वाहतूक व्यवस्थेचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे.आर्वी शहराच्या मुख्य व रहदारीच्या मार्गावरून जड वाहनांचा राज्यमार्ग जात असल्याने या रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलिसांची यंत्रणा तोकडी पडत आहे. द्रुगवाडा-पुलगाव-आर्वी-हैदराबाद हा राज्यमार्ग आर्वीतून जातो. यात आर्वी मार्गे पुलगाव हैदराबादला जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. लोकसंख्या वाढत असल्याने वाहनांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे रस्ते गर्दीने गजबजत असल्याचे दृष्य सर्वत्र पहायला मिळते. याच मार्गावर सर्व शासकीय कार्यालये आहेत. तहसील व न. प. कार्यालयासमोर सध्या फेरीवाले आणि हातगाडी दुकानदारांचे अतिक्रमण वाढले आहे. शिवाजी चौक हा शहरातील मुख्य मार्ग असल्याने या मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. पोलीस विभागाच्यावतीने या मार्गावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी व जड वाहनांना शहरात येण्यापासून मज्जाव करण्यासाठी वाहतूक कर्मचारी असणे गरजेचे आहे. यात रहदारीच्या मुख्य मार्गावरून भरधाव जड वाहने देऊरवाडा मार्गे धावतात. यात शिवाजी चौकासमोरील शासकीय कार्यालयासमोर रहदारीच्या रस्त्यावर हातफेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढल्याने रस्ते अरुंद झाले. परिणामी वाहतुकीचा खोळंबा होत आहे. यात बरेचदा किरकोळ अपघातही होतात. तसेच यामुळे शहरातील मुख्य रस्त्याला बकाल स्वरूप आले आहे. शिवाजी चौक ते गांधी चौक या मार्गावरही फेरीवाले व हातगाडी चालकांचे अतिक्रमण वाढला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने सदर अतिक्रमण काढून रस्ते मोकळे करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. यात सुनील कटियारी, रामनाथ गुरूनाथसिंगाणी, सुनील वधवा, किसन कोडवानी, महेश करतारी, सोनू मोटवानी, आदी व्यापाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत सदर मागणी केली आहे. यात पालिका प्रशासन व पोलीस विभाग याची संयुक्त कारवाई होणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)