शहरं
Join us  
Trending Stories
1
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
2
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
3
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
7
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
8
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
9
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
10
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
11
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
12
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
13
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
14
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
15
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
16
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
17
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
18
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
19
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
20
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पामुळे बाधित गावांच्या पुनर्वसनाला गती

By admin | Updated: December 16, 2014 22:57 IST

निम्न वर्धा, आजनसरा, लाल नाला आदी सिंचन प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळावा, यासाठी सलगरितीने पाणी पोहचविण्यासाठी पाटचऱ्यांच्या कामांना प्राधान्य देण्यासोबतच

मुख्यमंत्र्यांची माहिती : विधान भवनात जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा
वर्धा : निम्न वर्धा, आजनसरा, लाल नाला आदी सिंचन प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळावा, यासाठी सलगरितीने पाणी पोहचविण्यासाठी पाटचऱ्यांच्या कामांना प्राधान्य देण्यासोबतच अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी वर्धा जिल्ह्याच्या विकास कामांच्या आढावा बैठकीत दिल्यात.
विधान भवन येथे वर्धा जिल्ह्यातील सिंचन, कृषी, वीज तसेच दळणवळण आदी विभागांचा आढावा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आमदार रणजित कांबळे, डॉ. पंकज भोयर, कुणावार, उर्जा विभागाचे अप्पर मुख्य सचिव अजय मेहता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव के.पी. बक्षी, जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर, विभागीय आयुक्त अनुपकुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव विवेक नाईक, जिल्हाधिकारी एन.नवीन सोना, मुख्य कार्यपालन अधिकारी उदय चौधरी, मुख्य अभियंता अजित सगणे आदी उपस्थित होते. सिंचनाचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेले सर्व कामे तातडीने पूर्ण करावेत. तसेच वन जमिनीमुळे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांचे प्रस्ताव केंद्र शासनास सादर करण्याला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
गांधी फॉर टुमारो प्रकल्पाला गती
४९५ कोटी रूपये खर्चाचा सेवाग्राम विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. याअंतर्गत कंव्हेंशन सेंटर व आश्रमाच्या परिसरातील कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यईल. पहिल्या टप्प्यात १४ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रधान करण्याच्या सूचना दिल्यात.(जिल्हा प्रतिनिधी)
रस्त्यांच्या कामांची तपासणी करणार
पथकामार्फत तपासणी करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वर्धा शहरातील रेल्वे उड्डाण पुलाचे रूंदीकरण नागपूर-बोरी-तुळजापूर या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तसेच सिंदी गावाजवळ नवीन रेल्वे उड्डाण पुलाच्या कामांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. कृषी पंपांना वीज जोडणीच्या कार्यक्रमाअंतर्गत आॅक्टोबर अखेरपर्यंत ४ हजार ७७ प्रलंबित असलेल्या वीज जोडण्या मार्च १६ पर्यंत पूर्ण करण्यात येतील. जिल्ह्यात नादुरूस्त झालेले ४०९ रोहित्रे बदलविली असून इंन्फ्रा २ योजनेंतर्गत विद्युत सुधारण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविले जात असल्याचे उर्जा विभागाचे प्रधान सचिव अजय मेहता यांनी सांगितले.