शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

थंडीमुळे जिल्ह्याचा ‘फिवर रेट’ आठ टक्क्यांवर

By admin | Updated: November 27, 2014 23:40 IST

जिल्हाभर सर्वत्रच तापाचे रुग्ण दिसत असले तरी गेल्या चार दिवसांपासून थंडी वाढल्याने जिल्ह्याचा ‘फिवर रेट’ आठ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. पर्यायाने शासकीय व खासगी रुग्णालयातील

पांघरुणामुळे डासांना प्रतिबंध : जाड कपडेही ठरतात उपयोगी
यवतमाळ : जिल्हाभर सर्वत्रच तापाचे रुग्ण दिसत असले तरी गेल्या चार दिवसांपासून थंडी वाढल्याने जिल्ह्याचा ‘फिवर रेट’ आठ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. पर्यायाने शासकीय व खासगी रुग्णालयातील गर्दीही बऱ्यापैकी ओसरली आहे.
वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस यामुळे गेल्या काही महिन्यांपासून रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली होती. यातील बहुतांश रुग्ण व्हायरल फिवरचे होते. यासोबतच जिल्ह्यात डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांचीही संख्या मोठ्या प्रमाणात होती. यावर्षी डेंग्यूने दोन रुग्णांचा तर तापाने सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाच्या दप्तरी घेण्यात आली आहे. डेंग्यूचे संशयित म्हणून एक हजार ४०० रुग्णांचे रक्त नमुने घेवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी केली गेली. त्यात १०४ रुग्णांचे रक्त नमुने पॉझिटीव्ह आढळून आले. त्यांना वेळीच उपचार करून यातून बाहेर काढले गेले. विविध प्रकारच्या तापाची साथ आतापर्यंत कायम आहे. जिल्ह्यातील १६ उपजिल्हा रुग्णालये, ४६५ आरोग्य उपकेंद्र आणि ६३ प्राथमिक आरोग्य केंद्रात तापाच्या रुग्णांची नोंद घेतली गेली. शासकीय रुग्णालयात दरदिवशी ओपीडीमध्ये नोंद होणाऱ्या रुग्णसंख्येपैकी तब्बल २० टक्के रुग्ण हे विविध प्रकारांच्या तापाचे असल्याचे तपासणीत आढळून आले. गेली काही महिने यवतमाळ जिल्ह्याचा ‘फिवर रेट’ २० टक्के एवढा होता. परंतु गेल्या चार-पाच दिवसांपासून थंडी वाढली आहे. त्यामुळे हा फिवर रेट १२ टक्क्यांनी कमी होवून आठ टक्क्यांवर आला आहे. थंडी आणखी वाढताच हा ‘फिवर रेट’ एक-दोन टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तविली गेली आहे.
‘फिवर रेट’ कमी होण्यासाठी थंडी सर्वाधिक उपयोगी ठरली आहे. कारण थंडीमुळे नागरिक अंगावर जाड कपडे घालतात. झोपताना पूर्णवेळ अंगावर पांघरूण राहते. त्यामुळे डास चावत नाही. पर्यायाने डेंग्यू व तापाची लागण होत नाही, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. तरीही प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १४ ते १९ नोव्हेंबरपर्यंत हिवताप विभागाने खास सप्ताह राबवून फॉगिंग, कोरडा दिवस, नाल्या वाहत्या करणे, उकिरडे गावाबाहेर हलविणे आदी उपक्रम घेतले. त्याचा फायदा नागरिकांच्या आरोग्यासाठी होत असल्याचे सांगण्यात आले. हिवताप विभागाला निधी, वाहनांची अडचण असल्याने अनेक आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यास अडचण येत असल्याची बाबही यानिमित्ताने पुढे आली. (जिल्हा प्रतिनिधी)