शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIDMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
3
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
4
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
5
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
6
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
7
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
8
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
9
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
10
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
11
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
12
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
13
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
14
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
15
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
16
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
17
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
18
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
19
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
20
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
Daily Top 2Weekly Top 5

खरसखांडा ते ठाणेगाव रस्त्याची दुरवस्था

By admin | Updated: May 29, 2016 02:22 IST

खरसखांडा ते ठाणेगाव हा तीन किमी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पायी चालणेही कठीण झाले आहे.

काम निकृष्ट दर्जाचे : ग्रामस्थांकडून दुरुस्तीची मागणी
कारंजा (घा.) : खरसखांडा ते ठाणेगाव हा तीन किमी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पायी चालणेही कठीण झाले आहे. या रस्त्याची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी सरपंच विकास नासरे व ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.
काही वर्षांपूर्वी हा रस्ता तयार करण्यात आला होता. डांबरीकरणही झाले; पण निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहने तर सोडा पायी चालणेही कठीण झाले आहे. अत्यंत दुरवस्था झालेल्या या रस्त्यावरून विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना ठाणेगाव, कारंजा येथे ये-जा करावी लागते. दुचाकी वा चार चाकी वाहनांना या रस्त्याने जाताना असह्य त्रास सहन करावा लागतो.
पूढे पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. गत निवडणुकीत हा रस्ता दुरूस्त करण्याचे आश्वासन लोकप्रतिनिधींनी दिलीत; पण निवडणुकीची आश्वासने पाळण्यासाठी नव्हे तर मते घेण्यासाठी असतात, या नियमानुसार हा रस्ता अद्याप दुरूस्त झाला नाही. यामुळे हा रस्ता त्वरित दुरूस्त करून ग्रामस्थांची समस्या सोडवावी, असा ठराव खरसखांडा ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. सदर ठराव व निवेदन सरपंच विकास नासरे, उपसरपंच विनोद नारनवरे व ग्रामस्थांनी आ. अमर काळे यांना पाठविले आहे. शिवाय संबंधित विभागांनाही निवेदन व ठरावाच्या प्रती देण्यात आल्या आहेत. याकडे लक्ष देत रस्त्याची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)