शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त गाव पुरस्कारातून गाव विकास करा

By admin | Updated: November 13, 2014 23:07 IST

महात्मा गांधी तंंंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत ४८५ तंटामुक्त गावांना पुरस्कार मिळाले असून, पुरस्काराची रक्कम गाव समितीने अद्याप खर्च केलेली नाही. तंटामुक्त गाव समितीने लोकहिताच्या

वर्धा : महात्मा गांधी तंंंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत ४८५ तंटामुक्त गावांना पुरस्कार मिळाले असून, पुरस्काराची रक्कम गाव समितीने अद्याप खर्च केलेली नाही. तंटामुक्त गाव समितीने लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक असलेली कामे तात्काळ घ्यावीत अशा सूचना जिल्हाधिकारी एन.नवीन सोना यांनी गुरुवारी दिल्यात.महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी नवीन सोना यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पत्रकारांसाठी महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम अंतर्गत असलेल्या पुरस्काराच्या धनादेशाचे वितरण जिल्हाधिकारी यांच्याहस्ते करण्यात आले. २०१२-१३ या वर्षामध्ये प्रवीण होणाडे यांना विभागीय स्तरावरील द्वितीय पुरस्कार जाहीर झाला होता. तसेच जिल्हास्तरावर मालती गावंडे यांना पुरस्कार मिळाला होता. या दोन्ही पुरस्काराच्या धनादेशाचे वितरण जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक संतोष वानखेडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, आर्वीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कानुज प्रसाद, उपविभागीय महसूल अधिकारी विलास ठाकरे, हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी घनश्याम भुगावकर तसेच महसूल व पोलीस अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात शांतात राहावी तसेच गावातील तंटे गावातच सोडविण्याच्या दृष्टीने तलाठी, पोलीस पाटील व ठाणेदार यांनी ग्रामस्तरावर नियमित बैठकी घेवून या योजनेबाबत ग्रामस्थांना विश्वासात घेण्याची आवश्यकता व्यक्त करताना जिल्हाधिकारी सोना म्हणाले, जिल्ह्यात १३ ग्रामपंचायती तंटामुक्त झालेल्या नसून या ग्रामपंचायतींना या मोहिमेत सहभागी करुन घेण्यासाठी प्रयत्न करावे असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात प्रत्येक गावात पोलीस पाटलाची नियुक्ती असणे आवश्यक असून ज्या गावामध्ये अद्यापर्यंत नियुक्तया झाल्या नाहीत अशा गावाचे प्रस्ताव सादर करावे तसेच तंटामुक्त आदर्श गावाना मिळालेला पुरस्कारातून गावात आवश्यक सुविधा निर्माण करुन यासंबंधीचा अहवाल एका महिन्यात सादर करावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी सांगितले. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत विभागीय स्तरावर द्वितीय ठरलेल्या प्रवीण होणाडे यांना ७५ हजार रुपयाचा धनादेश तसेच जिल्हा स्तरावरील मालती गावंडे यांना २५ हजार रुपयांचा धनादेश देऊन जिल्हा प्रशासनातर्फे त्यांचा गौरव करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी पत्रकारांसाठी असलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.(शहर प्रतिनिधी)