शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीची शेती ठरतेय तोट्याची

By admin | Updated: November 29, 2014 01:59 IST

‘कापूस म्हणजे समृद्धी’ असे समीकरण झालेल्या आर्वीची ‘कॉटन सिटी’ म्हणून ओळख होती़ हे..

पिंपळखुटा : ‘कापूस म्हणजे समृद्धी’ असे समीकरण झालेल्या आर्वीची ‘कॉटन सिटी’ म्हणून ओळख होती़ हे वैभव अनुभवलेल्या तालुक्यावर आता क्विंटलने नव्हे तर किलोने कापूस मोजण्याची वेळ आली आहे़ लहरी निसर्ग व बी-बियाणे, खतांचे वाढते दर, मजुरांची टंचाई यामुळे कापसाची शेती म्हणजे तोट्याचा व्यवसाय, असा समज रूढ झाला आहे. यंदा कापूस व सोयाबीनने शेतकऱ्यांना पूर्णत: उद्ध्वस्त केले आहे़
शेती अन् शेतकरी, हा आता थट्टेचा विषय झाला आहे. निसर्ग आणि सातबारा कोरा करू पाहणाऱ्या निगरगट्ट शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या करीत आहे. नापिकीतून कर्जाचा डोंगर वाढत गेला की शेतकरी कापसाचा गळफास करतो. यंदाही निसर्गाने अशीच स्थिती करून ठेवली आहे. अनेक समस्या सहन करून कापूस आता घरात येऊ लागला तर हमीभावाचे भीजत घोंगडे कायम आहे़ शासनाने ४०५० रुपये भाव घोषित केला; पण पणनची खरेदी ठराविक ठिकाणी असल्याने खेडा खरेदीत शेतकऱ्यांची लूट होत आहे. अग्रीम बोनस शासन कुणाला देणार, हे स्पष्ट होत आहे. खेडा खरेदीत वजन करण्याचे मोजमाप नाही. भावात गय नाही, अशाप्रकारे शेतकऱ्यांची लुटच होत आहे. यंदा सोयाबीनचा उतारा घटला आणि कपाशीलाही एकरी विशेष उत्पादन मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट कोसळले आहे़(वार्ताहर)