शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

वनसंवर्धनासाठी ‘ग्राम व वन’ संकल्पना

By admin | Updated: July 24, 2014 23:59 IST

वनाच्छादन क्षेत्र टिकविण्यासाठी तसेच संवर्धनासाठी गावांचा सहभाग वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ग्राम व वन ही संकल्पना राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत वर्धा

वर्धा : वनाच्छादन क्षेत्र टिकविण्यासाठी तसेच संवर्धनासाठी गावांचा सहभाग वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ग्राम व वन ही संकल्पना राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत वर्धा जिल्ह्यातील १० गावांमध्ये चराईबंदी आणि कुऱ्हाडबंदी सारखे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. वनसंवर्धनाची संपूर्ण जबाबदारी आता गावांची राहणार आहे.वनविभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी वनांच्या संवर्धनासाठी ग्राम व वन ही संकल्पना राज्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राम व वनांचे व्यवस्थापन करण्यासाठी वनव्यवस्थापन समिती राहणार असून, ही समिती दशवर्षीय सुक्ष्मआराखडा तसेच वार्षिक आराखडा तयार करणार आहे. वृक्ष व वन साधन संपत्तीचा ऱ्हास टाळण्यासाठी ग्रामवन हा कार्यक्रम प्रभावी ठरणार आहे.ग्राम व वन या योजनेमध्ये गावातील समूहाने किंवा ग्रामपंचायतीने राखीव वनांचे किंवा संरक्षित वनांचे व्यवस्थापन व संरक्षण करणे अपेक्षित आहे. यामध्ये शुन्य अतिक्रमण, नैसर्गिक पुनर्निर्मितीचा वाढता दर, गत तीन वर्षामधील प्रत्येक वर्षामध्ये जळालेल्या क्षेत्रातील टक्केवारी ५ टक्क्यांपेक्षा अधिक असू नये, झाडे लावल्यापासून पाचव्या वर्षाच्या अखेरीस या क्षेत्रामध्ये झाडे जगण्याचे प्रमाण ६० टक्के पेक्षा अधिक असावे आणि चराई बंदी आणि कुऱ्हाडबंदी याची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या गावांचा समावेश राहणार आहे.जिल्हास्तरावर ग्राम व वन योजनेंतर्गत ग्रामसभा घेवून या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या तसेच अटींची पूर्तता करणाऱ्या दहा गावांचा समावेश करण्यात येणार आहे. या गावांमध्ये वनाच्छादन वाढविण्यासोबतच त्यांचे संवर्धन तसेच गावांच्या पुर्ततेसाठी १० लक्ष रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गावातील रोजगाराच्या व इतर गरजा पूर्ण करण्यासाठी कौशल्यविकास सारख्या योजनांची अंमलबजावणी व इतर योजनांचा लाभही या गावांना मिळणार आहे. वनउत्पादनातून मिळणाऱ्या उत्पान्नाचा विनीयोग करण्यासंदर्भात संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांना लागू असलेली मार्गदर्शक तत्व ग्रामसभेला स्वीकारता येतील.प्रमुख वन उत्पादनामधून उत्पन्नाचा एक तृतीयांश उत्पन्न ग्रामसभेच्या मान्यतेने पुनर्वनरोपणासाठी, वनसंधारणासाठी व गावाच्या विकासासाठी हा निधी खर्च करता येईल. यासाठी विविध समित्या गठीत करण्यात येणार आहेत. या समितीच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)