शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

स्वगावी येताय? एवढे कराच, कोरोनाचे टळेल संक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 5:00 AM

विलगीकरणात असताना स्वत:सोबतच सर्वांची काळजी घ्या, लोकांत फिरून आपला अपमान करून घेऊ नका, आपल्याकडे किंवा शेजाऱ्यांकडे बाहेरगावाहून कुणी व्यक्ती आली असेल तर लगेचच प्रशासनाला कळवा, कोरोनाची कुणालाही बाधा होऊ शकते, त्यामुळे आपल्याला काहीच होत नाही, या भ्रमात राहू नका, बाहेरगावाहून येणारा किंवा अनोळखी व्यक्तीला कोरोना झालाय, असे समजूनच काळजी घ्या.

ठळक मुद्देमहात्मा फुले समता परिषदेचे दिवाकर गमे यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशभरासह राज्यात आणि जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्यांचा बाधितांमध्ये समावेश आहे, तेव्हा स्वगावी येताय तर काही नियम पाळायलाच हवे, तर कोरोनाविरुद्धचा लढा आपण जिंकू शकू, असे आवाहन महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे यांनी केले आहे.स्वगावी वर्ध्यात येताना चोरट्या मार्गाने येऊ नका तर राजरोसपणे या, गाव आमचे-तुमचे असल्याने प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करा, नक्कीच तुमचे स्वागत होईल. केवळ १५ दिवस विलगीकरणात रहा, या काळात घरातील कुणालाही स्पर्श करू नका, वस्तूंचा एकत्रित वापर करणे टाळा, किराणा, भाजीपाला धान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंची गरज भासली तर मोबाईलवरून संपर्क करून सांगा अथवा लांबूनच हाक मारा, विलगीकरणात राहिले म्हणजे गावातील नागरिकांना तुमचा अभिमान वाटेल, शेजारी व इतर तुम्हाला पैसे नसतील तरी हवी ती मदत करतील. विलगीकरणात असताना स्वत:सोबतच सर्वांची काळजी घ्या, लोकांत फिरून आपला अपमान करून घेऊ नका, आपल्याकडे किंवा शेजाऱ्यांकडे बाहेरगावाहून कुणी व्यक्ती आली असेल तर लगेचच प्रशासनाला कळवा, कोरोनाची कुणालाही बाधा होऊ शकते, त्यामुळे आपल्याला काहीच होत नाही, या भ्रमात राहू नका, बाहेरगावाहून येणारा किंवा अनोळखी व्यक्तीला कोरोना झालाय, असे समजूनच काळजी घ्या. या संपूर्ण बाबींचे पालन केले तर आपण कारोनाविरुद्धचा लढा सहजपणे जिंकू शकू, असे प्रा. गमे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या